नवी दिल्ली ः देशातील सुमारे २.३ दशलक्ष हेक्टर क्षेत्र सेंद्रिय शेतीने व्यापले अाहे, अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंह यांनी दिली अाहे.
रासायनिक शेतीकडून सेंद्रिय शेतीकडे वळावेत, यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जात अाहे. त्यासाठी केंद्र सरकार अनेक योजना राबवित अाहे, असेही त्यांनी सांगितले.
ते अाॅर्गेनिक वर्ल्ड कॉंग्रेस कार्यक्रमात बोलत होते. शेतीमध्ये रासायनिक वापर अधिक होत असल्याने हवामान बदलाच्या समस्येला तोंड द्यावे लागत अाहे. तसेच पर्यावरणातदेखील असमतोल निर्माण झाला असून त्याचा मानवी जीवनावर परिणाम होत आहे. यामुळे मानवी आरोग्यासाठी सेंद्रिय शेती राष्ट्रीय आणि जागतिक गरज बनल्याचे कृषिमंत्री सिंह यांनी म्हटले अाहे.
देशातील सुमारे ३,६०,४०० उत्पादक शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळले अाहेत. त्यांना परंपरागत कृषी विकास योजनेचा लाभ देण्यात अाला अाहे, असेही त्यांनी सांगितले.
ईशान्य भारतातील ५० हजार हेक्टर क्षेत्र सेंद्रिय शेतीखाली आणण्याचे केंद्र सरकारचे उद्दिष्ट्य आहे. सध्या येथील ४५ हजार ८६३ हेक्टर क्षेत्र सेंद्रिय शेतीने व्यापले अाहे, अशीही माहिती त्यांनी दिली.