नाशिक : ‘‘महावितरणच्या कळवण विभागाच्या आदेशानुसार देवळा उपविभागांतर्गत प्रत्येक गावात कृषीपंप वीज बिल भरा. अन्यथा, रोहित्र कट करण्याची अनागोंदी मोहीम सुरू आहे. हा नियमबाह्य प्रकार अशोभनीय आहे. जर शेतकऱ्यांना मुदत न देता रोहित्र खंडित करून शेतकऱ्यांना त्रास देण्याचा महावितरणकडून प्रयत्न झाल्यास कुठल्याही प्रकारची पूर्व सूचना न देता कार्यालयात उंदीर सोडून आंदोलन करू’’, असा इशारा प्रहार शेतकरी संघटनेने दिला.
कोरोना संकटामुळे शेतकरी आधीच नेस्तनाबूत झाला आहे.अशातच पावसाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. थोडासा पाऊस पडला, तर उसनवारी करून शेतीत पेरण्या करत आहेत. अशा परिस्थितीत विद्युत वितरण कंपनी रोहित्र खंडित करून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे प्रहार शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे.
कांदा भावाच्या चढ-उतारामुळे शेतकरी हतबल आहे. महावितरणने मात्र वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम हाती घेतलेली आहे. शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन पूर्व सूचना देऊन १५ दिवसांची मुदत नोटीस बजावण्यात यावी. नंतरच वीजपुरवठा खंडित करावा, अशी मागणी आहे. मागणीचे निवेदन उपकार्यकारी अभियंत्यांसह तहसीलदार दत्ता शेजुळ देवळा यांना देण्यात आले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.