जळगाव जिल्ह्यात बोंडअळीचा उद्रेक

जळगाव जिल्ह्यात यंदा शेतकऱ्यांना अतिवृष्टीने अगोदर मारले. आता शिल्लक कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने कपाशी उपटून फेकण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यातील ५ लाख ३९ हजार हेक्टरवरील कपाशीवर बोंडअळीचा प्रादूर्भाव झाला आहे.
Outbreak of bollworm in Jalgaon district
Outbreak of bollworm in Jalgaon district

जळगाव ः जिल्ह्यात यंदा शेतकऱ्यांना अतिवृष्टीने अगोदर मारले. आता शिल्लक कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने कपाशी उपटून फेकण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यातील ५ लाख ३९ हजार हेक्टरवरील कपाशीवर बोंडअळीचा प्रादूर्भाव झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली. आगामी खरीप हंगामातील कपाशीवर बोंडअळी येऊ नये, यासाठी शेतकऱ्यांना आता शेतात असलेली कपाशी उपटून फेकल्याशिवाय पर्याय नाही. यामुळे कृषी विभागाने शेतकऱ्यांमध्ये बोंडअळीबाबत जनजागृती करण्यासाठी कृषीरथ गावागावांतून काढण्याचे नियोजन केले आहे. जिल्ह्यात कापूस पिकावर गुलाबी बोंडअळीचा प्रादूर्भाव दिसून आल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बोंडअळीवर नियंत्रणासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, कृषी विकास अधिकारी वैभव शिंदे, कार्यक्रम समन्वयक हेमंत बाहेती, मोहीम अधिकारी पी. एस. महाजन, जिनिंग व प्रेसिंग असोसिएशनचे अविनाश काबरा, सुशिल सोनवणे आदी उपस्थित होते.   कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीच्या निर्मूलनाबाबत बियाणे कंपन्यांनी तयार केलेल्या चित्ररथाचे जिल्हाधिकारी राऊत यांच्या हस्ते अनावरण झाले. जिल्ह्यात सर्वदूर झालेला पाऊस व लांबलेल्या कालावधीमुळे कापूस पिकाचा हंगाम वाढविण्याची शक्‍यता आहे.  जिल्ह्यात कापूस पिकावर गुलाबी बोंडअळीचा प्रादूर्भाव दिसून आल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बोंडअळीवर नियंत्रणासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, कृषी विकास अधिकारी वैभव शिंदे, कार्यक्रम समन्वयक हेमंत बाहेती, मोहीम अधिकारी पी. एस. महाजन, जिनिंग व प्रेसिंग असोसिएशनचे अविनाश काबरा, सुशिल सोनवणे आदी उपस्थित होते.  कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीच्या निर्मूलनाबाबत बियाणे कंपन्यांनी तयार केलेल्या चित्ररथाचे जिल्हाधिकारी राऊत यांच्या हस्ते अनावरण झाले. जिल्ह्यात सर्वदूर झालेला पाऊस व लांबलेल्या कालावधीमुळे कापूस पिकाचा हंगाम वाढविण्याची शक्‍यता आहे. 

प्रतिक्रिया

सद्यःस्थितीत शेतकऱ्यांनी कापूस पिकावर अनावश्यक कीडकनाशकांचा वापर न करणे व फरदड न घेता कपाशीच्या पऱ्हाट्यापासून कंपोस्ट खत तयार करावे. हेच खत टाकल्यास जमिनीची सुपीकता वाढेल.  -संभाजी ठाकूर,  जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

बोंडअळीवर विविध उपाययोजना सुरू     बाधित कपाशी उपटून फेकण्याची वेळ     शेतकऱ्यांमध्ये बोंडअळीबाबत जनजागृतीसाठी कृषीरथ     जागृतीसाठी कृषीरथ गावागावांतून काढण्याचे नियोजन      पुढी हंगामातही किडीचा प्रादूर्भाव होण्याची भीती     कापूस पिकाचा फरदड न घेण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com