सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस; भात शेतीला दणका

पावसाचा भातपिकाला फटक बसत आहे
पावसाचा भातपिकाला फटक बसत आहे

सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच आहे. सोमवारी (ता. २१) सायंकाळी देखील विजांच्या कडकडाटांसह पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले. सतत पडणाऱ्या पावसामुळे भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे नदीनाल्यांमधील पाणी पातळीत पुन्हा वाढ झाली आहे. तसेच, पावसामुळे जिल्ह्यातील काही भागांतील वीजपुरवठा खंडित झाला होता.

जिल्ह्यात मॉन्सूनोत्तर पाऊस सुरूच आहे. सोमवारी सायकांळी सहा वाजण्याच्या सुमारास विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पावसाला सुरवात झाली. कणकवली, देवगड, वैभववाडी, सावंतवाडी, कुडाळ या तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला. सहा वाजता सुरू झालेला पाऊस रात्री बारा वाजेपर्यंत सुरूच होता. पावसामुळे भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांनी कापणी केलेल्या भात शेतांमध्ये पाणी साचल्याने पीक तरंगत आहे. या शेतीचे मोठे नुकसान होणार आहे.

दरम्यान मंगळवारी सकाळी तासभर सूर्यदर्शन झाले. त्यानंतर पुन्हा ढगाळ हवामान झाले. पाऊस पडण्याच्या शक्यतेने कापणी केलेले भात पीक बांधण्यासाठी शेतकऱ्यांची धांदल सुरू होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com