पुणे जिल्ह्यात ३८ टक्के क्षेत्रावर भात लागवड

पुणे जिल्ह्यात ३८ टक्के क्षेत्रावर भात लागवड
पुणे जिल्ह्यात ३८ टक्के क्षेत्रावर भात लागवड

पुणे ः पश्चिम पट्ट्यातील तालुक्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून दमदार पाऊस पडत आहे. यामुळे खोळंबलेल्या भात लागवडीला पुन्हा वेग आला आहे. आठवडाभर पाऊस राहिल्यास मोठ्या प्रमाणात भात लागवडी उरकण्याची शक्यता आहे. लवकर लागवड झालेल्या ठिकाणी भातरोपे वाढीच्या अवस्थेत असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.  

गेल्या दहा ते बारा दिवसांपूर्वी पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागातील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा या तालुक्यांत पावसाने उघडीप दिली होती. यामुळे भात लागवडी खोळंबल्या होत्या. वेळेवर भाताच्या पुनर्लागवडी न झाल्यास खरीप हंगाम अडचणीत येण्याची शक्यता होती. काही ठिकाणी पुनर्लागवडी झाल्या असल्या तरी, अनेक भागांत पुनर्लागवडी शिल्लक आहेत. जिल्ह्यात जूनमध्ये १६८.५ मिलिमीटर पाऊस पडला होता. तर २५ जुलैपर्यंत २८९.० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद कृषी विभागाकडे झाली आहे. 

गेल्या चार ते पाच दिवसांपासून या भागात पुन्हा जोर वाढला आहे. यामुळे शेतकऱ्यांनी भाताच्या पुनर्लागवडी वेगाने सुरू केल्या आहेत. त्यासाठी चार हजार ९७४ हेक्टरवर भात रोपवाटिका केल्या आहेत. जिल्ह्यात भाताचे सरासरी ७२ हजार ९५४ हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी आत्तापर्यंत २८ हजार २३७ हेक्टर म्हणजेच ३८ टक्के क्षेत्रावर भाताच्या पुनर्लागवडी झाल्या आहेत. चालू वर्षी सुमारे ६२ हजार ५०० हेक्टरवर लागवडी होण्याचा अंदाज आहे. त्यासाठी २० ते २५ दिवस अगोदर रोपवाटिका शेतकरी तयार करतात. सध्या अनेक ठिकाणी भात रोपवाटिकेतील रोपे वाढीच्या अवस्थेत आहेत. मात्र, सुरवातीला रोपे टाकलेल्या रोपवाटिकेतील रोपे लागवडीला आली आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी लागवडी केल्या आहेत. त्यासाठी आवश्यक असलेला पाऊस पडत होता. त्यामुळे भात पट्ट्यातील वेळेत भात लागवडी करण्यावर भर देत पुनर्लागवडी करण्यावर भर देत होते. 

गेल्या वर्षीही याच काळात पुणे जिल्ह्यात पाच हजार हेक्टरवर भात रोपवाटिका तयार झाल्या होत्या. चालू वर्षी पावसाने उशीर केला असला तरी, काही शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्यावर रोपवाटिका टाकल्या आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात भात रोपवाटिकेच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. यंदा अनेक शेतकऱ्यांनी भात रोपवाटिका टाकण्याऐवजी मावळ व मुळशी भागांतील काही शेतकऱ्यांनी एसआरटी पद्धतीने थेट भात लागवडी केल्या आहेत. त्यामुळे रोपवाटिकेच्या क्षेत्रात घट काही प्रमाणात घट झाली आहे. 

तालुकानिहाय पुनर्लागवडी पुढीलप्रमाणे आत्तापर्यंत हवेलीत ४० हेक्टर, मुळशी ३१५०, भोर ४३००, मावळ ५४४३, वेल्हे ३१५०, जुन्नर ६७५८, खेड ३७३१, आंबेगाव १६५४, पुरंदर ४१ हेक्टरवर भाताच्या पुनर्लागवडी झाल्या आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com