रत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यात

रत्नागिरीत भात लागवडीची कामे अंतिम टप्प्यात आहेत
रत्नागिरीत भात लागवडीची कामे अंतिम टप्प्यात आहेत

रत्नागिरी   ः जिल्ह्यात उशिरा पण समाधानकारक पावसामुळे दहा दिवस लांबलेल्या भात लागवडीची कामे आता अंतिम टप्प्यात आली आहेत. जिल्ह्यात ५० हजार हेक्टरवर भात लागवड पूर्ण झाल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.

जिल्ह्यात भाताचे सरासरी क्षेत्र ६९ हजार हेक्टर आहे. त्यातील सुमारे ६२ हजार हेक्टरवर भात लागवड केली जाते. यंदा मोसमी पाऊस १५ जूनपासून सुरू झाला. पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावल्यानंतर पेरणीच्या कामाला सुरवात झाली. रत्नागिरी जिल्ह्यात २५ मे दरम्यान धुळपेरण्या होतात. मात्र यंदा पावसाची लक्षणे पाहून १ जूननंतरच धुळपेरण्या झाल्या होत्या. नियमित पेरण्याही १० जूननंतरच सुरू झाल्या. खरीप हंगाम सुमारे दहा ते बारा दिवसांनी लांबला होता. रोपांची उगवण होण्यास आणि ती लागवडयोग्य होण्यासाठी किमान १५ ते २० दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे लागवडीची कामेही उशिराने सुरू झाली.

जून महिन्यात पावसाचे सातत्य नव्हते. जुलै महिन्यात पहिल्या पंधरवड्यात पावसाने जोर धरला. आतापर्यंत भात लागवडीची ८५ टक्के कामे पूर्ण झाल्यांचे जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडून सांगण्यात आले. 

सध्या जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडत आहे. जून महिन्यापासून आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी १४३३ मिमी पाऊस झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत सातशे मिमी कमी पावसाची नोंद झाली आहे. परिणामी लागवड लांबणार आहेत. याबाबत निवळी येथील शेतकरी म्हणाले, की यंदा पाऊस चांगला आहे. लागवडी सुरू झाल्या तेव्हा अनियमित पाऊस होता. लागवडी पूर्ण झाल्यानंतर मुसळधार पाऊस पडत आहे. आता हा जोर कमी होणे अपेक्षित आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com