शासन दरबारी रब्बी हंगामात नागपूर विभागातील पीक उत्तम

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नागपूर  : खरिपानंतर पाण्याअभावी रब्बी हंगामालाही फटका बसल्याचे सांगण्यात येत असले तरी शासन दरबारी मात्र रब्बीतील पीक परिस्थिती उत्तम आहे. रब्बी हंगामात एकाही गावाची पैसेवारी ५० पेक्षा कमी नसल्याची नोंद आहे.

मागील वर्षी कमी पावसामुळे खरीप पिकांवर परिणाम झाला. उत्पादनात घट झाली. शासनाकडून आर्थिक मदत जाहीर करण्यात आली. काही शेतकऱ्यांच्या खात्यात ही मदत जमाही झाली. मात्र, अनेक शेतकरी यापासून वंचित आहेत. नदी, धरणांत कमी पाणी असल्याने रब्बी पिकांसाठी शेतकऱ्यांना पुरसे पाणी मिळाले नाही. यामुळे शेतकऱ्यांना पाहिजे त्या प्रमाणात फायदा झाला नसल्याचे सांगण्यात येते. अनेक शेतकऱ्यांनी तर रब्बीत पीकच घेतले नसल्याची माहिती आहे. पिकांना मिळालेला भावही समाधानकारक नसल्याची तक्रार होत आहे. असे असताना शासन दरबारी मात्र सर्व आलबेल असल्याचे चित्र आहे. 

नागपूर विभागात १६६ गावांमध्ये रब्बीत पिके घेण्यात येतात. यंदा फक्त ९८ गावांमध्ये रब्बीचे पीक घेण्यात आले. या गावांमध्ये पैसेवारी ५० पेक्षा जास्त दर्शविण्यात आली आहे. म्हणजे पीक परिस्थिती उत्तम आहे. ६८ गावांमध्ये यंदा पीकच घेण्यात आले नाही. यात सर्वाधिक ६४ गावे गडचिरोली जिल्ह्यातील आहेत. चार गावे भंडारा जिल्ह्यातील आहेत. पाणी नसल्याने पीक घेण्यात आली नसल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.  

पैसेवारी स्थिती
जिल्हा गावांची संख्या पैसेवारी जाहीर केलेली गावांची संख्या
नागपूर ०० ००
वर्धा  ०० ००
भंडारा  १४  १०
गोंदिया ०० ००
चंद्रपूर 
गडचिरोली १४९   ८५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com