पालखेड डाव्या कालव्याचे आवर्तन पुढील १५ दिवस कायम ठेवणार

पालखेड डाव्या कालव्याचे आवर्तन  पुढील १५ दिवस कायम ठेवणार
पालखेड डाव्या कालव्याचे आवर्तन पुढील १५ दिवस कायम ठेवणार

विंचूर, जि. नाशिक : पालखेड डाव्या कालव्यातून पिण्याच्या पाण्यासाठी सुरू असलेले सात दिवसाचे आवर्तन पुढे १५ दिवस कायम सुरू ठेवण्याचे आश्वासन राज्याचे जलसंपदामंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी येथील शिष्टमंडळास दिले. त्यासंबंधीचे आदेशही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

महाजन हे जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीसाठी नाशिक दौऱ्यावर आले होते. भाजपच्या ओ.बी.सी. मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष कैलास सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली.

पावसाळा सुरू होऊन जवळपास दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेला आहे. या दरम्यान निफाड व येवला तालुक्यांंमध्ये जेमतेम १५५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. पाण्याअभावी खरिपाची पिके करपू लागली आहेत. त्याचबरोबर द्राक्षबागा, पेरू, डाळिंंब या फळबागा संकटात आल्या असून शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. या सर्व पिकांना पाण्याची नितांत गरज आहे. पालखेड डाव्या कालव्याचे आवर्तन पुढे १५ दिवस कायम सुरू ठेवावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

शिष्टमंडळात भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव वाघ, निफाड पंंचायत समिती सदस्य संजय शेवाळे, निफाड पंचायत समितीचे माजी सभापती विलास गोरे, नीलेश सालकाडे, सोपान दरेकर, भारत कानडे, अमोल निकम, अरविंद पाटील, विलास पाटील आदींचा समावेश होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com