परभणीत शेतकरी प्रश्‍नांवर भाजपचे धरणे आंदोलन

Parbhani in farmers problems on agitation
Parbhani in farmers problems on agitation

परभणी ः जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोयाबीनचा पीकविमा परतावा मंजूर करावा. अतिवृष्टीमुळे पीकहानीचे अनुदान देण्यात यावे. सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी. सात-बारा कोरा करून शेतकरी चिंतामुक्त करावेत आदी मागण्यांसाठी भाजपतर्फे गुरुवारी (ता. २०) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

जिल्ह्यातील ४ लाख ६७ हजार ३८३ शेतकऱ्यांना २०१९ च्या खरीप हंगामातील २ लाख ४८ हजार ७९३ हेक्टरवरील सोयाबीनच्या नुकसानीपोटी प्रतिहेक्टरी ३० हजार रुपये विमा परतावा मंजूर करण्यात यावा. अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना पीक नुकसानीपोटी प्रतिहेक्टरी २५ हजार रुपये अनुदान तत्काळ अदा करण्यात यावे. सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफी करून सात बारा कोरा करून चिंतामुक्त करण्यात यावे़, आदि मागण्या केल्या. 

या वेळी जिंतूरच्या आमदार मेघना बोर्डीकर-साकोरे, जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम, विठ्ठल रबदडे, प्रताप देशमुख, बालाप्रसाद मुंदडा, सुरेश भुमरे आदींसह कार्यकर्ते मोठे संख्येने सहभागी झाले होते.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com