थेट विक्रीसाठी शेतकरी, गटांचा सहभाग वाढला

ग्राहकांची मागणी शेतकरी व शेतकरी गटांकडे नोंदविली जात आहे. रास्त दरात फळे भाजीपाला मिळत असल्याने ग्राहकांचीही पसंती या उपक्रमाला मिळते आहे. बाजारातील गर्दी टाळण्यासाठी शहरातील सोसायट्यांनी थेट शेतकऱ्यांकडून फळे भाजीपाला खरेदीसाठी पुढे यावं यासाठी प्रयत्न सुरू आहेत. - डॉ. तुकाराम मोटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, औरंगाबाद
vagetable
vagetable

औरंगाबाद: शहरातील ग्राहकांकडून संचार बंदीच्या काळात थेट शेतकऱ्यांकडून फळे भाजीपाला खरेदीला पसंती मिळत आहे. कृषी पणन सहकार महानगरपालिका व जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नातून शेतकऱ्यांकडून थेट ग्राहकांना शेतमाल विक्रीची प्रक्रिया सुरू झाली. दोन दिवसात या प्रक्रियेतून जवळपास दीडशे क्विंटल फळे भाजीपाल्यांची ग्राहकांनी खरेदी केली. कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या संचार बंदीमुळे शेतमालाची विक्री करण्याची अडचण निर्माण झाली होती. जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने व फळे भाजीपाला विक्री सुरू राहणार असल्याचे कळले असले तरी ग्राहकांकडून औरंगाबाद बाजार समितीमध्ये खरेदीसाठी गर्दी केली जात होती. ही गर्दी कमी करण्यासाठी उपाययोजना म्हणून जिल्हा प्रशासनाच्यावतीने शेतकऱ्यांकडून थेट ग्राहकांना फळे भाजीपाला विक्रीचे नियोजन करण्यात आले. त्यासाठी बंद पडलेले शेतकरी आठवडे बाजार नियम व सूचनांच्या अधीन राहून सुरू करण्यात आले. याशिवाय कृषी विभागाकडून विविध शेतकरी व शेतकरी गटांना त्यांच्या उत्पादित शेतमालाच्या थेट ग्राहकांना विक्रीसाठी पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले. त्याचा परिणाम म्हणून औरंगाबाद जिल्ह्यातील विविध गावातील जवळपास २१ फळे व भाजीपाला उत्पादक शेतकरी तथा शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपन्यांनी आपल्याकडील उत्पादित फळे भाजीपाला थेट ग्राहकांना विक्रीची तयारी दाखवली. 

२९ मार्चला पहिल्याच दिवशी या शेतकरी शेतकरी गट व फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या उत्पादित फळे भाजीपाल्याची जवळपास १३ शेतकरी, शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपन्यांनी ७४१३ किलो विक्री केली. ३० मार्चला थेट विक्री करण्याची तयारी दाखवणाऱ्या शेतकरी व गटांची संख्या २८ वर पोहोचली. तर त्यापैकी जवळपास १६ शेतकरी गटांनी ७४६१ किलो भाजीपाला व फळांची थेट ग्राहकांना विक्री केली.रास्त दरात थेट शेतकऱ्यांकडून फळे भाजीपाला मिळत असल्याने ग्राहकही त्याला प्रतिसाद देत असल्याचे चित्र आहे.

बाजार समितीमधील किरकोळ खरेदी बंद शहरातील जाधववाडी बाजार समितीमधील फळे, भाजीपाला बाजारातील किरकोळ खरेदी मंगळवारपासून (ता.३१) बंद करण्यात आल. या किरकोळ खरेदीसाठी मुख्य रस्त्यालगत दुकाने लागली होती. तर बाजार समितीमध्ये ठोक खरेदी विक्रीचा सुरू असल्याने बाजार समिती आवारात होणारी गर्दी कमी झाली होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com