तापमानातील चढ-उताराचा अंजीर उत्पादकांना फटका

तापमानातील चढ-उताराचा अंजीर उत्पादकांना फटका
तापमानातील चढ-उताराचा अंजीर उत्पादकांना फटका

परभणी : तापमानातील चढ-उतारामुळे अंजिराची फळे अपरिपक्व अवस्थेत झाडावरच सुकून जात आहेत, तसेच परिपक्व झालेली फळेदेखील लवकरच सडत आहेत. त्यामुळे सिंगणापूर (ता. जि. परभणी) येथील अंजीर उत्पादक शेतकऱ्यांना यंदा मोठा आर्थिक फटका बसला आहे.

सिंगणापूर येथील माणिकराव सूर्यवंशी यांची दहा वर्षापासून दोन एकरावर अंजीर बाग आहे. दरवर्षी आॅगस्ट महिन्यात छाटणी केल्यानंतर फेब्रुवारी ते जून या कालावधीत अंजीर फळांचा हंगाम असतो. अंजिराचे चांगले उत्पादन मिळाले होते. परंतु यंदाच्या हंगामात जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात तापमानात मोठे चढ-उतार झाले. अनेकदा रात्रीचे तापमान १० अंश सेल्सिअस पेक्षाही कमी तर दिवसाचे तापमान ३० अंश सेल्सिअसच्या पेक्षा अधिक होते. तापमानात अचानक चढ-उतार झाल्यामुळे अंजिराची अपरिपक्व अवस्थेतील फळे झाडावर सुकून जात आहेत. परिपक्व झालेली फळेदेखील लवकरच सडून जात आहेत. त्यामुळे विक्री केलेली फळेसुद्धा व्यापाऱ्याने परत केली.

अंजीर फळाची सड झाल्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे, असे सूर्यवंशी यांनी सांगितले. सिंगणापूर येथील शेतकरी सतीश सोगे म्हणाले, की चार एकर अंजीर बाग आहे. सुरुवातीला उत्पादन मिळाले, परंतु आता फळे सुकून गळून पडत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com