काश्‍मीर बंदमुळे पेअर, सफरचंद सडले

काश्‍मीर बंदमुळे पेअर, सफरचंद सडले
काश्‍मीर बंदमुळे पेअर, सफरचंद सडले

नवी दिल्ली ः काश्मीर खोऱ्यात सुरू असलेल्या बंदमुळे पेअर आणि सफरचंद फळपीक तोडणी अभावी सडत आहे. तसेच रेशन आणि रोख रक्कम संपल्यामुळे नागरिकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे, असे तीन पंचायत सदस्यांनी सांगितले.

दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील असणारे तालिब हुसेन यांनी पंचायत सदस्य इक्बाल अहमद आणि मुमताज अहमद खान यांच्यासमवेत सांगितले की, त्यांनी घाटीतील वास्तव लोकांना कळवावे म्हणून ते राष्ट्रीय राजधानीत आहेत. या महिन्याच्या सुरवातीस, केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा मागे घेण्यासाठी घटनेच्या कलम ३७० च्या तरतुदी रद्द केल्या आणि त्यास दोन केंद्र शासित प्रदेशात विभागले. तेव्हापासून काश्मीर खोऱ्यातील प्रमुख भाग सुरक्षेच्या निर्बंधाखाली आहेत.

हुसेन म्हणाले, ‘‘आमचे नासपती तोडणीस तयार आहेत. मात्र, ते जागेवर कुजत आहेत. आता पीच आणि सफरचंदही सडत आहेत. दुकाने उघडली नाहीत, आम्हाला रेशन कोठून मिळणार? तांदूळ व इतर मूलभूत वस्तूंची कमतरता आहे.’’

जम्मू-काश्मीरची अर्थव्यवस्था मुख्यत्वे कृषी आणि पर्यटनावर आधारित आहे. सन २०१८-१९ मध्ये राज्यात १९.५६ लाख मेट्रिक टन नवीन फळांचे उत्पादन घेतले होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com