आंबेजोगाई, जि. बीड : किसानपुत्र आंदोलनाच्या आवाहनानुसार शुक्रवारी (ता. १८) राज्यात शेतकरी पारतंत्र्य दिन पाळण्यात आल्याची माहिती किसान पुत्र आंदोलनच्या वतीने देण्यात आली.
१८ जून १९५१ रोजी पहिली घटनादुरुस्ती करून परिशिष्ट-९ची निर्मिती करण्यात आली. या परिशिष्टात टाकलेल्या कायद्याच्या विरोधात न्यायालयात दाद मागता येत नाही. सीलिंग, आवश्यक वस्तू, जमीन अधिग्रहण हे नरभक्षी कायदे या परिशिष्टात टाकलेले आहेत. या कायद्यांमुळे सुमारे साडेतीन लाख शेतकऱ्यांच्या आत्महत्या केल्या आहेत. आज परिशिष्ट ९ मध्ये २८४ कायदे आहेत त्या पैकी २५० कायदे शेती व शेतकऱ्यांशी थेट संबंधित आहेत. किसानपूत्र आंदोलन पहिल्या घटनादुरुस्तीचा निषेध करण्यासाठी दरवर्षी १८ जूनला शेतकरी पारतंत्र्य दिवस पाळते.कोरोनाच्या पार्शवभूमीवर हा दिवस किसानपुत्रांनी वैयक्तिक पाळावा, असे ठरले होते. तरीही अनेक कल्पक किसानपुत्रांनी स्थानिक स्तरावर वेगवेगळे कार्यक्रम केले. काळी फीत लावणे, घरावर व वाहनावर काळी पताका लावणे आदी कार्यक्रम किसानपुत्रांनी केले.
किसानपुत्र जागा झाला ः अमर हबीब महाराष्ट्रात ठिकठिकाणी शेतकरी पारतंत्र्य दिवस किसानपुत्रांनी पाळला. त्यांची संख्या आणि उत्साह पाहता किसानपुत्र जागा झाला आहे असे ठामपणे म्हणता येईल, असे मत किसानपुत्र आंदोलनचे अमर हबीब यांनी व्यक्त केले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.