विकासकामांमध्ये लोकसहभाग महत्त्वाचा ः जिल्हाधिकारी पापळकर

विकासकामांमध्ये लोकसहभाग महत्त्वाचा ः जिल्हाधिकारी पापळकर
विकासकामांमध्ये लोकसहभाग महत्त्वाचा ः जिल्हाधिकारी पापळकर

अकोला  ः ‘‘महाराष्ट्र शासन व भारतीय जैन संघटनेमार्फत राबविण्यात येत असलेल्या सुजलाम् सुफलाम् प्रकल्पांतर्गत गावांमध्ये करावयाचे पाणंद रस्ते विकास व जलसंधारण कामांसाठी गावकऱ्यांची एकजूट आणि लोकसहभाग महत्त्वाचा आहे,’’ असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले. येथील नियोजन भवनात या संदर्भात सरपंच तसेच जिल्हा, तालुका व ग्रामपातळीवरील अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत या प्रकल्पाची माहिती देऊन त्याद्वारे करावयाच्या कामांबाबत माहिती देण्यात आली. या वेळी प्रकल्पाचे जिल्हा समन्वयक प्रा. सुभाष गादिया, भारतीय जैन संघटनेचे संचालक सुशांत भुयान, राज्य प्रकल्प व्यवस्थापक नंदकिशोर लोंढे, लेखा अधिकारी मिलिंद साधू, जिल्हा व्यवस्थापक नितीन राजवैद्य, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर वासनिक तसेच उपजिल्हाधिकारी (रोहयो) बाबासाहेब गाढवे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ उपस्थित होते. या अभियानाअंतर्गत गावात पाणंद रस्ते तयार करावयाचे आहेत. त्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री ही भारतीय जैन संघटनेमार्फत मोफत देण्यात येणार आहे. फक्त डिझेल व मशिन चालकाचे मानधन हे लोकसहभागातून द्यावयाचे आहे. त्यासाठी गावातील कोणती कामे करावयाची यावर एकमत होऊन त्यानुसार नियोजन होणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी गावात सामंजस्य असणे आवश्यक आहे. , असे जिल्हाधिकारी पापळकर यांनी सांगितले. नंदकिशोर लोंढे, प्रा. गादिया यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपजिल्हाधिकारी गाढवे यांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com