उत्तर प्रदेशात ५१४ कोटींचा ‘पेप्सिको’चा खाद्यपदार्थ प्रकल्प

उत्तर प्रदेशात ५१४ कोटींचा  ‘पेप्सिको’चा खाद्यपदार्थ प्रकल्प
उत्तर प्रदेशात ५१४ कोटींचा ‘पेप्सिको’चा खाद्यपदार्थ प्रकल्प

नवी दिल्ली : अन्न आणि शीतपेय उत्पादनात मोठी कंपनी असलेली पेप्सिको इंडिया उत्तर प्रदेशात ५१४ कोटींचा खाद्यपदार्थ प्रकल्प उभारणार आहे. या संदर्भातील परस्पर सामंजस्य करार नुकताच गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत करण्यात आला आहे.  २०२२ पर्यंत खाद्यपदार्थ व्यवसायात दुप्पटीचे लक्ष गाठण्यासाठी कंपनी नवे गुंतवणूक धोरण राबविणार आहे. या प्रकल्पाद्वारे राज्यात सुमारे १५०० प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती करणार आहे. याबाबत माहिती देताना कंपनीने भारतीय अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अहमद अलशेख म्हणाले,‘‘पेप्सिको कंपनी भारतात खाद्यपदार्थ निर्मितीत वाढीसाठी वचनबद्ध आहे. उत्तर प्रदेशातील लोकांबरोबर आमचे जुने संबंध आहेत. येत्या काही वर्षांत खाद्यपदार्थ उत्पादन दुप्पट करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे, याअनुषंगाने आम्ही उत्तर प्रदेशात ५१४ कोटींच्या प्रकल्पासाठी गुंतवणूक करत आहोत.’’ या उद्योगाच्या पार्श्‍वभूमीवर आम्ही स्थानिक शेतकऱ्यांना चांगले पीक उत्पादन आणि व्यवस्थापन पद्धती पुरवू, जेणे करून उत्तर प्रदेशातील बटाटा उत्पादक शेतकऱ्यांच्या सामाजिक आणि आर्थिक विकासास मदत होईल, असे अलशेख म्हणाले. पुरवठा साखळी सक्षम करण्यासाठी पेप्सिको इंडिया कंपनी शीतगृह सुविधा राज्यात उभी करेल, असे त्यांनी सांगितले.  कंपनीकडून बटाटा खरेदी... पेप्सिको इंडिया कंपनी ३० वर्षांपासून भारतातील शेतकऱ्यांशी संलग्न असून, सध्या लेज आणि अंकल चिप्स या उत्पादनाकरिता देशभरातील १३ राज्यांतील सुमारे २४ हजार शेतकऱ्यांकडून बटाटा विकत घेते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com