सांगली : खरीप व रब्बी गावांचे वर्गीकरण केल्याप्रमाणे खरीप ६३३ व रब्बी १०३ अशी एकूण ७३६ गावांपैकी ६३३ गावांची सुधारित पीक पैसेवारी ५० पैशांपेक्षा जास्त आली आहे. जिल्हा प्रशासनाने ही आकडेवारी जाहीर केली आहे. पैसेवारी ५० पैशांपेक्षा अधिक असल्याने शासनाच्या विविध योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता असल्याने लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे.
जिल्ह्याची सुधारित पीक पैसेवारी ३१ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये जिल्ह्यातील खरिपाची ६३३ आणि रब्बी १०३ गावांमधील पीक पैसेवारी प्रशासनाने जाहीर केली आहे. यामध्ये दुष्काळी जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, तासगाव, खानापूर, तालुक्यांसह सर्वच दहा तालुक्यांची पीक पैसेवारी ५० पैशांपेक्षा जास्त आहे.सर्वच गावांची पीक पैसेवारी ५० पैशांपेक्षा जास्त असल्याने शेतकरी शासनाच्या अनेक लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी लक्ष घालण्याची गरज आहे. किमान अंतिम पैसेवारी काढताना ५० पैशांच्या आत काढली, तरच शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, अशी परिस्थिती असल्याचे दिसते आहे.
अवकाळी पावसामुळे २०० कोटींचे नुकसान झाले आहे. ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी पावसामुळे खरीप हंगामातील पिकांबरोबर भाजीपाला, डाळिंब, द्राक्ष बागांचे सुमारे २०० कोटींचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील खरीप पेरण्याच्या सुरुवातीस पावसाने ओढ दिल्याने पिकांची वाढ पुरेशी झाली नव्हती. पिके वाळली होती. तरी देखील जिल्ह्यातील खरीप हंगामातील पिकांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा जास्त कशी, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करू लागले आहेत.
तालुका | गावे | ५० पैसे पेक्षा जास्त पैसेवारी |
मिरज | ७२ | ७२ |
तासगाव | ६९ | ६९ |
कवठेमहांकाळ | ६० | ६० |
जत | १२३ | ५४ |
खानापूर | ६८ | ६८ |
आटपाडी | ६० | २६ |
पलूस | ३५ | ३५ |
कडेगाव | ५६ | ५६ |
वाळवा | ९८ | ९८ |
शिराळा | ९५ | ९५ |
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.