सोलापूर जिल्ह्यात सर्वच गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी नाहीच

सोलापूर : जिल्ह्यातील सर्व गावातील खरीप पिकांचा सुधारित गोषवारा जाहीर झाला. ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांची संख्या शून्य आहे.
 The percentage of all the villages in Solapur district is not less than 50 paise
The percentage of all the villages in Solapur district is not less than 50 paise

सोलापूर : जिल्ह्यातील सर्व गावातील खरीप पिकांचा सुधारित गोषवारा जाहीर झाला. ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांची संख्या शून्य आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. आता खरीप हंगामाची अंतिम पैसेवारी येत्या १५ डिसेंबरला जाहीर होणार आहे. 

पाऊस कमी झाल्यास ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांची संख्या वाढली असती, परंतु, यंदा पाऊस चांगला झाला. त्यामुळे ५० पैशांपेक्षाही कमी पैसेवारी असलेल्या गावांची संख्या शून्य राहिली आहे. दरवर्षी खरीप आणि रब्बी हंगामाची पैसेवारी काढली जाते.

प्रतिवर्षी त्या-त्या हंगामात तीन टप्प्यात ही पैसेवारी काढली जाते. सुरवातीच्या टप्प्यात हंगामी पैसेवारी मोजली जाते. त्यानंतर सुधारित पैसेवारी आणि नंतर अंतिम पैसेवारी अशा तीन टप्प्यात ही पैसेवारी काढली जाते. त्यानुसारच हंगामाचं भवितव्य ठरलं जातं. चांगल्या पावसामुळे सुधारित पैसेवारीप्रमाणेच अंतिम पैसेवारीतील गावेही याच पद्धतीने शून्यावर येतील, असे सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com