पिकांवर कीड, रोगांचा वाढणार प्रादुर्भाव

गेल्या दोन दिवसांपासून राज्यात बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण तसेच काही ठिकाणी रिमझिम पाऊस झालेला आहे. अशा बदलत्या हवामानामुळे रब्बी पिके तसेच फळबागांमध्ये कीड,रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.
पिकांवर कीड, रोगांचा वाढणार प्रादुर्भाव
पिकांवर कीड, रोगांचा वाढणार प्रादुर्भाव

पुणे ः गेल्या दोन दिवसांपासून राज्यात बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण तसेच काही ठिकाणी रिमझिम पाऊस झालेला आहे. अशा बदलत्या हवामानामुळे रब्बी पिके तसेच फळबागांमध्ये कीड,रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. प्रादुर्भावाची लक्षणे तपासून नियंत्रणाच्या उपाययोजना करणे गरजेचे आहे, असा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिलेला आहे.

बदलत्या वातावरणाचा परिणाम  हरभरा  पीक सध्या वाढीच्या अवस्थेत आहे. सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे घाटे अळीचा प्रादुर्भाव वाढू शकतो. हलका पाऊस पिकाला फायदेशीर राहील, शेतात पाणी साठणार नाही याची काळजी घ्यावी.  गहू  ढगाळ हवामान ५ ते ६ दिवस राहिल्यास मावा कीड आणि तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. उशिरा लागवड झालेल्या ठिकाणी शेंडे माशीच्या प्रादुर्भावाची शक्यता आहे. सध्याच्या काळात थंडी कमी झाल्यामुळे पिकाची वाढ मंदावण्याची शक्यता आहे.  करडई  ढगाळ वातावरणामुळे मावा किडीचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे.  तूर  बहुतांश ठिकाणी शेंगा पक्व झालेल्या आहेत. परंतु उशिरा पेरणी झालेल्या ठिकाणी प्रतिकूल वातावरणामुळे शेंग माशी, शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.  कांदा  सातत्याने ढगाळ वातावरण आणि काही भागात पाऊस झाल्याने करपा रोगाच्या प्रसार वाढेल.  भाजीपाला  ५ ते ६ दिवस ढगाळ हवामान राहिले तर टोमॅटो, बटाटा पिकामध्ये करपा रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो.  वेलवर्गीय भाजीपाला पिकात डाऊनीच्या प्रादुर्भावाची शक्यता आहे.  हापूस आंबा बहुतांश बागांच्यामध्ये मोहोर फुटलेला आहे. ढगाळ वातावरण जास्त दिवस राहिले तर तुडतुडे कीड, भुरी, करपा रोगांचा प्रादुर्भाव होईल.  केसर आंबा सध्या मोहोर बाहेर पडलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये मराठवाडा विभागात बहुतांश ठिकाणी ढगाळ हवामान आहे. काही ठिकाणी रिमझिम पाऊस देखील होत आहे. अशा हवामानामध्ये भुरी आणि तुडतुड्याच्या प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. पाऊस जास्त दिवस राहिला तर मोहोराची गळ होण्याची शक्यता आहे.  काजू  सध्याच्या तापमानातील चढउतारामुळे मोहाराच्या वाढीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.  लिंबूवर्गीय फळपिके   ज्या बागांच्यामध्ये पुरेसा ताण बसलेला नाही तेथे पाऊस झालेला असेल तर नवीन नवती निघेल. परंतु जेथे पुरेसा ताण बसलेला आहे. तेथे पुढील काळात चांगला फुलोरा येईल. ढगाळ वातावरण टिकून राहिले तर पांढरी माशी, कोळी किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.  डाळिंब  ढगाळ वातावरणामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. रोगाचा प्रादुर्भाव ओळखून नियंत्रणासाठी फवारणी करावी.  केळी  ज्या बागेत सध्या करपा रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे, तेथे ढगाळ वातावरणामुळे आणखी प्रसार होऊ शकतो. परंतु ज्या बागांचे व्यवस्थापन चांगले आहे, तेथे सध्याच्या वातावरणाचा फारसा परिणाम होणार नाही.  द्राक्ष   पाऊस जास्त झालेल्या बागांमध्ये मणी तडकण्याची समस्या उद्भवू शकते. तसेच जिथे पाऊस झाला असून, बागेत पूर्वीपासून डाऊनी मिल्ड्यूचे बीजाणू आहेत, अशा ठिकाणी डाऊनी मिल्ड्यूचा प्रादुर्भाव वेगाने वाढू शकतो. जिथे सलग काही दिवस ढगाळ वातावरण आहे, अशा ठिकाणी द्राक्ष बागेमध्ये भुरी रोगाचा प्रादुर्भाव वाढणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com