गडचिरोली ः जिल्ह्यात हमीभावाने खरेदी करण्यात आलेल्या धानाची पावसाळ्यापूर्वी उचल करावी, अशी मागणी आमदार डॉ. देवराव होळी यांनी केली आहे. आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या केंद्रावर हे धान पडून आहे. वेळीच उचल न झाल्यास ते खराब होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
या संदर्भात त्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. गडचिरोली जिल्ह्यात शासकीय केंद्रावर धानाची मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्यात आली. १८३५ रुपयांचा हमीभाव तसेच ७०० रुपये बोनस व सानुग्रह यामुळे दर २५०० रुपयांवर पोचले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी हमीभाव केंद्रावर धान विकण्यासाठी गर्दी केली.
सध्या हे धान खरेदी केद्रावर पडून आहे. त्यासोबतच बारदाना तर कधी साठवणुकीचा प्रश्न निर्माण झाल्याने बऱ्याच शेतकऱ्यांना आपले धान विकता देखील आले नाही. याची दखल घेत शेतकऱ्यांकडील धानाची हमीभावाने खरेदी व्हावी. त्यासोबतच केंद्रावरील धानाची पावसाळ्यापूर्वी उचल करावी, अशी मागणी आमदार होळी यांनी केली आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.