शेतकऱ्यांच्या गरजेनुरूप योजनांचा हवा आराखडा ः बोंडे

शेतकऱ्यांच्या गरजेनुरूप योजनांचा हवा आराखडा
शेतकऱ्यांच्या गरजेनुरूप योजनांचा हवा आराखडा

अमरावती  ः बांधावर जाऊन शेतकऱ्यांची मागणी आणि गरज लक्षात घेत योजनांचा आराखडा तयार होणे गरजेचे आहे. परंतु तसे न होता मुंबई, पुण्यात वातानुकूलित कक्षात बनून हे काम होते. त्यामुळेच जखम डोक्‍याला आणि उपचार गुडघ्याला अशी अवस्था कृषी योजनांची झाली आहे, असे प्रतिपादन खुद्द कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केल्याने खळबळ उडाली आहे.  महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. हे अभियान पाच तालुक्‍यातील ३४ ग्रामपंचायतीमार्फत राबविण्यात येत आहे. ग्रामविकासासाठी सर्व विभागांची मोट बांधून योजना पोचविण्यासाठी ग्राम परिवर्तक नेमून सदर अभियानाची अंमलबजावणी केली जात आहे. या वेळी अभियानाचे कार्यकारी संचालक उमाकांत दांगट, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री, टाटा ट्रस्टच्या मीनाक्षी झा, व्यवस्थापक युवराज सासवडे आदी उपस्थित होते.  शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून तशा योजना तयार कराव्यात. गावातील उच्चविद्याविभूषित किंवा मोठ्या पदावर असलेल्या नागरिकांना ग्रामविकासात सहभागी करून घेण्याचे आवाहन डॉ. बोंडे यांनी यावेळी केले. ग्राम परिवर्तन अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीबद्दल काही गावातील सरपंचांचा सत्कार या वेळी करण्यात आला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com