अकोला ः पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या मदतीस अपात्र असलेल्या तसेच आयकर भरणाऱ्यांकडून हा निधी परत घेण्याची प्रक्रीया राबवली जात आहे. वऱ्हाडातील तीन जिल्ह्यात सुमारे साडे तेरा कोटींपेक्षा अधिक निधी परत घेतला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
पात्र नसतानाही सन्मान योजनेची मदत मिळालेल्यांबाबत केंद्र शासनाकडून जिल्हा प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानंतर जिल्ह्यांच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने कारवाई सुरू केली. आयकर खात्याकडूनही कर भरणाऱ्यांबाबत माहिती दिली जाणार आहे. केंद्र शासनाने सुरुवातीला अल्प व अत्यल्प भूधारकांसाठी ही योजना सुरू केली होती. त्यानंतर सर्वच शेतकऱ्यांचा समावेश केला आहे.
वर्षाला सहा हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात. यात आयकर भरणारेही लाभार्थी बनले आहेत. नोकरी करणारे, सेवानिवृत्ती वेतन, एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त व्यक्तीला लाभ ही या योजनेत अपात्र ठरण्याची कारणे आहे. अशांचा शोध घेण्यासाठी तहसील पातळीवरून शोध मोहीम उघडण्यात आली आहे.
अकोला जिल्ह्यात ७१०४ शेतकऱ्यांकडून ४ कोटी ८९ लाख रुपये वसुलीस पात्र असल्याचे समजते. तर बुलडाणा जिल्ह्यात ५९८६ शेतकऱ्यांकडून पाच कोटी ३३ लाख १६ हजार रुपये परत घेतले जाणार आहेत. वाशीम जिल्ह्यात ४९९६ शेतकऱ्यांकडून ३ कोटी ८३ लाख रुपये परत घेतले जातील.
अपात्रतेची मुख्य कारणे
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.