सांगलीत डाळिंबाचा मृग बहर संकटात

दुष्काळामुळे अगोदरच शेतकरी अडचणीत आला आहे. त्यातच यंदाच्या मृग हंगामातील डाळिंब पीक धोक्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शासनाने मदत करावी .- शिवलिंग संख, अध्यक्ष, अखिल महाराष्ट्र डाळिंब उत्पादक व संशोधन संघ मृग हंगामाला वातावरण पोषक असते. परंतु, यंदा पोषक वातावरण नव्हते. तीन वेळा कळी आली, परंतु ती कळी झाडावर राहिली नाही. वीस वर्षांत कधीच मृग बहराने दगा दिला नाही. - किशोर देशमुख, आटपाडी, जि. सांगली
सांगलीत डाळिंबाचा मृग बहर संकटात
सांगलीत डाळिंबाचा मृग बहर संकटात

सांगली : राज्यात डाळिंबाचा सुमारे ४० ते ५० टक्के मृग बहर धरला जातो. परंतु पाण्याची कमतरता आणि पोषक वातावरण नसल्याने मृग हंगामातील डाळिंब धोक्यात आले आहे. हंगामात सुमारे ४० टक्के डाळिंबाचे उत्पादन घटण्याची शक्यता डाळिंब उत्पादकांनी व्यक्त केली आहे. कळीचे सेटिंग झाले नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी पुन्हा नव्याने पानगळ करून मृग बहर धरण्यासाठी प्रयत्न केले आहेत.

राज्यात सुमारे १ लाख ५० हजार हेक्टर डाळिंबाचे क्षेत्र आहे. दरवर्षी सुमारे ४० ते ५० टक्के म्हणजे ६० हजार ते ७० हजार हेक्टर क्षेत्र मृग हंगामातील डाळिंबाचा बहर धरला जातो. या बहरातील डाळिंब नोव्हेंबर-डिसेंबरदरम्यान बाजारात विक्रीस येतात. जानेवारी डाळिंबाची निर्यात सुरू होते. त्या दरम्यान, डाळिंबाला सरासरी ९० ते १०० रुपये प्रतिकिलो दर मिळतो. यामुळे शेतकऱ्यांचा कल मृग बहरातील डाळिंबाचे उत्पादन घेण्याकडे वाढला आहे. 

जानेवारी ते एप्रिलपर्यंत या महिन्यात वळीव पाऊस झाला नाही. त्यातच शेतकऱ्यांनी एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या काळात शेतकरी टॅंकरने पाणी दिले. यंदाही शेतकऱ्यांनी जोरदार तयारी करून हंगाम धरला. प्रचंड खर्च करून बागा जगविल्या. त्यानंतर शेतकरी पावसाच्या प्रतीक्षा करू लागला. परंतु, यंदा पाऊस झालाच नाही. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे उपलब्ध पाणी होते, त्यावर डाळिंबाचा बहर धरला. परंतु त्यानंतर पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली. तरीदेखील शेतकऱ्यांनी टॅंकरने पाणी देऊन उत्पादन घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे या बहरातील तीन वेळा कळी आली. परंतु, त्याचे सेटिंग झाले नाही. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. 

शेतकऱ्यांनी डाळिंबाला उपलब्ध पाणी देऊन बहर धरला. अनेक ठिकाणी डाळिंबाच्या बागा फुलल्या आहेत. गेल्या आठवड्यापासून पुन्हा पाऊस सक्रिय झाला आहे. वातावरणात सातत्याने बदल होऊ लागला आहे. परिणामी फुलगळ होण्यास सुरवात झाली असून, फळांचे सेटिंग होत नाही. त्यामुळे डाळिंबाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com