भीमा नदीकाठचा विद्युतपुरवठा सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी

भीमा नदीकाठचा विद्युतपुरवठा सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी
भीमा नदीकाठचा विद्युतपुरवठा सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी

सोलापूर  : उजनी धरणातून भीमा नदीला पाणी सोडण्यात आले आहे, परंतु हे पाणी सोलापूरच्या औज बंधाऱ्यात पोचेपर्यंत भीमा नदीकाठचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला. हा विद्युत पुरवठा दिवसातून किमान चार तास तरी सुरू करावा, अशी मागणी महर्षी वाल्मीकी संघाचे अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी पंढरपूर प्रांताधिकारी कार्यालय, महावितरण कार्यालयाकडे केली. 

भीमा नदी भरून वाहत असूनही विद्युत पुरवठा खंडित केल्यामुळे पशु-प्राण्यांना पिण्याचे पाणी मिळत नाही. शेतकऱ्यांचे पशुधन धोक्‍यात आले आहे. किमान शेतकऱ्यांच्या गुराढोरांना तरी पिण्याचे पाणी मिळावे, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.

भीमा नदीकाठचा विद्युत पुरवठा खंडित केल्यामुळे इलेक्‍ट्रीक मोटारी बंद आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या पशुधनासाठी मिळणारा पाणीपुरवठा बंद झाला आहे. आधीच चारा महाग झाल्याने अव्वाच्या सव्वा रक्कम मोजून शेतकरी पशुधन वाचवण्यासाठी धडपड करीत आहेत. त्यात आता जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍नही उभा ठाकला आहे. 

हा विद्युत पुरवठा लवकर सुरू करावा, अन्यथा आम्हाला लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागेल, असा इशाराही त्यांनी या निवेदनाद्वारे दिला. या वेळी संतोष कांबळे, गुलशन सावंत, महेश कांबळे, मोहन बुधवले, धनाजी सर्जे, सोनबा सावंत, पोपट चव्हाण, लखन जाधव, वैभव कांबळे, अक्षय कोळी आदींसह महर्षी वाल्मीकी संघाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com