दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नी ‘प्रहार’चा आज राजभवनाला घेराव 

‘प्रहार’ संघटनेचा आज राजभवनाला घेराव 
‘प्रहार’ संघटनेचा आज राजभवनाला घेराव 

अकोला ः राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रुपयांची मदत द्यावी, या मागणीसाठी प्रहारचे आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात गुरुवारी (ता. १४) मुंबई येथे राजभवनावर आंदोलन करण्यात येणार आहे. 

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रुपये मदत, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, पीकविम्याची रक्कम त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, या मागण्यांसाठी आंदोलन केले जाणार आहे. गुरुवारी दुपारी २ वाजता राजभवन, मलबार हिल या ठिकाणी संघटनेकडून आंदोलन केले जाणार आहे. आंदोलनात शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यात सरकार स्थापन होण्याचा कोणताही मार्ग अजूनही दिसत नसल्याने राज्यपाल यांनी सद्यःस्थितीत शेतकऱ्यांच्या अडचणींकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाने राज्यातील शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झालेली आहे. शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पावसात वाहून गेलेला आहे. 

राज्यात त्वरित ओला दुष्काळ जाहीर करून शेतकरी बांधवांना शासनातर्फे त्वरित मदत मिळावी व पीकविम्याची रक्कम ताबडतोब मिळावी, अशा विविध मागण्यांसाठी मोर्चा हा राजभवनावर धडकणार आहे. 

राज्यातील सर्व शेतकरी बांधव व शेतमजुरांनी या मोर्च्यात सहभागी होऊन आपला बुलंद आवाज शासनापर्यंत पोचवण्यासाठी जास्तीत- जास्त संख्येने सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com