उद्यापासून वळीवाची शक्यता; विदर्भात उष्णतेचा कहर

उद्यापासून वळीवाची शक्यता; विदर्भात उष्णतेचा कहर
उद्यापासून वळीवाची शक्यता; विदर्भात उष्णतेचा कहर

पुणे ः गेल्या काही दिवसांपासून विदर्भात उष्णतेने कहर केला आहे. या उष्णतेने तामपानात कमालाची वाढ झाली आहे. गुरुवारी (ता. ३०) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत विदर्भातील चंद्रपूर येथे जगातील उच्चांकी ४८.० अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. वाढत्या उष्णतेमुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. उद्यापासून (ता. १) राज्यात वळवाचा पाऊस बरसणार असल्याची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविली.    मध्य प्रदेश ते उत्तर कर्नाटक यादरम्यान असलेला विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. हे क्षेत्र समुद्रसपाटीपासून नऊशे मीटर उंचीवर आहे. तर उत्तर प्रदेशाच्या परिसरात चक्राकार वाऱ्याची स्थिती असून, अरबी समुद्रात परिसरातही कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, त्याचे रूंपातर चक्राकार वाऱ्यांमध्ये होण्याची शक्यता आहे. गुजरातच्या परिसराही चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. त्याचा परिणाम राज्यातील वातावरणावर होईल. त्यामुळे पूर्वमोसमी पावसासाठी आवश्यक असलेले वातावरण तयार होत आहे. राज्यात उद्या काही अंशी हवामान ढगाळ राहणार असून, राज्यात पूर्वमोसमी पाऊस पडण्याचे संकेत आहे.  उष्णतेच्या लाटेमुळे सकाळी आठ वाजल्यापासून उन्हाच्या झळा तीव्र होत आहे. यामुळे कमाल तापमानाचा पारा वाढण्यास सुरवात होऊन दुपारी कमाल तापमानाचा पारा ४५ अंश सेल्सिअसच्या वर जात आहे. सायंकाळी सहा वाजेपर्यंत उन्हाचा चटका राहत असून, त्यानंतर कमाल तापमान घटण्यास सुरवात होत आहे. मध्यरात्रीनंतर हवेत काही प्रमाणात गारवा तयार होतो. त्या वेळी कमाल तापमानात चांगलीच घट होताना दिसत आहे. उन्हाच्या चटक्यामुळे विदर्भातील बहुतांशी शहराचा पारा ४५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. मराठवाड्यातही उन्हाच्या झळा कायम असून, खानदेशातही उन्हाचा चटका चांगलाच वाढला आहे. मध्य महाराष्ट्र व कोकणातही उन्हाचा चटका वाढला असून, उकाड्यात चांगलीच वाढ झाली आहे.  उष्णतेच्या लाटेमुळे ४३ अंश सेल्सिअसच्या वर गेलेली प्रमुख शहरे ः  मालेगाव, जळगाव, सोलापूर, बीड, परभणी, नांदेड, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वाशीम, वर्धा, यवतमाळ.   गुरुवार (ता. ३०) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांतील विविध ठिकाणचे कमाल, कंसात सरासरीच्या तुलनेत किमान तापमानातील वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) :  पुणे ३९.७ (३.८), जळगाव ४४.२ (२.०), कोल्हापूर ३८.०, महाबळेश्‍वर ३३.८ (५.३), मालेगाव ४३.६ (४.३), नाशिक ३८.३ (१.३), सांगली ३९.४, सातारा ४०.३ (५.३), सोलापूर ४४.४ (४.९), मुंबई (सांताक्रूझ) ३४.४ (०.९), मुंबई ३४.२ (०.३), अलिबाग ३२.७ (-०.६), रत्नागिरी ३३.५ (०.७), डहाणू ३४.८ (०.५), औरंगाबाद ४२.१ (३.३), बीड ४४.२ (४.६), परभणी ४६.१ (४.७), नांदेड ४४.५ (३.२), उस्मानाबाद ४३.५ (५.१), अकोला ४५.७ (३.९), अमरावती ४६.४ (४.४), बुलडाणा ४२.६ (४.९), ब्रह्मपुरी ४७.५ (४.७), चंद्रपूर ४८.० (४.७), गोंदिया ४३.५ (०.७), नागपूर ४६.० (३.२), वाशीम ४४.०, वर्धा ४६.९ (४.३) यवतमाळ ४५.५ (४.०).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com