नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेची सांगता गुरुवारी (ता. १९) नाशिक येथे झाली. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित राहून सभेला संबोधित केले. मात्र, सध्याच्या ज्वलंत शेतीप्रश्नांवर न बोलता मुख्य प्रश्न दुर्लक्षित केल्याने सभास्थानी उपस्थित शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरले. थेट मुद्द्यांवर चर्चा न झाल्याने सभेनंतर दबक्या आवाजात त्यांनी आपली नाराजी बोलून दाखविली.
नाशिक जिल्ह्यात द्राक्ष, कांदा, ऊस, मका ही प्रमुख पिके आहेत. मात्र, चालू वर्षी अनेक अडचणी शेतकऱ्यांना भेडसावत आहे. त्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची पिके मातीमोल झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यांच्या वेदना सोबत घेऊन अनेक जण सभास्थळी उपस्थित होते. जिल्ह्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांचे मुख्य पीक असलेल्या कांद्याच्या भावाबाबत सरकारने अनेक निर्णय घेऊन दर नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात लष्करी अळीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे या सर्व प्रश्नांवर या सभेत उहापोह होईल, अशी खात्री घेऊन शेतकरी सभेला उपस्थित होते. मात्र, ज्वलंत शेतीप्रश्नावर कोणीच स्पष्ट न बोलल्याने मोठा भ्रमनिरास झाल्याचे उपस्थितांच्या चर्चेमधून दिसून आले.
देवळा तालुक्यातील एका ज्येष्ठ शेतकऱ्याने सांगितले, मी सरकारला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित होतो. मात्र, आमच्या प्रश्नांवर सरकार स्पष्टपणे बोलले नाही. बागलाण तालुक्यातील एका शेतकऱ्याने सांगितले, चालू वर्षी लष्करी अळीने मोठे नुकसान केल्याने आर्थिक कोंडीत सापडलो आहे. तर बियाणे व औषधांच्या कंपन्यांनी आमची लूट केल्याचा आरोप केला. शेतकऱ्यांचा सरकारवर रोष असल्याचे या निमित्ताने सभेनंतर दिसून आले.
शेतकऱ्यांनी मांडलेले प्रश्न
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.