कोल्हापुरात पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेस प्रारंभ

कोल्हापुरात पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेस प्रारंभ
कोल्हापुरात पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेस प्रारंभ

कोल्हापूर : पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेंतर्गत जिल्ह्यात आत्तापर्यंत ३ लाखांहून अधिक शेतकरी कुटुंबांची नोंदणी झाली असून ७ हजार ४०० शेतकरी कुटुंबांच्या बॅंक खात्यावर पहिल्या हप्त्याची रक्कम जमा केली आहे. प्रशासनाने या कामास सर्वोच्च प्राधान्य दिले असल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी रविवारी (ता. २४) येथे दिली. शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने सुरू केलेल्या पंतप्रधान शेतकरी निधी योजनेचा जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय प्रारंभ जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या हस्ते करण्यात आला, त्याप्रसंगी ते बोलत होते. 

आमदार अमल महाडिक, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, प्रांताधिकारी सचिन इथापे, त्रिगुण कुलकर्णी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे, कृषी विकास अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, कृषी विद्यापीठाचे कृषी विद्यावेत्ता डॉ. अशोक पिसाळ आदी उपस्थित होते. 

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेंतर्गत जिल्ह्यातील पात्र शेतकरी कुटुंबांच्या खात्यात पहिला हप्ता येत्या २८ फेब्रुवारीपर्यंत जमा करण्याचा निर्धार असल्याचे सांगून जिल्हाधिकारी देसाई म्हणाले की, ‘‘जिल्ह्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात कार्यान्वित करण्यात आली असून, या योजनेंतर्गत अल्प व अत्यल्पभूधारक शेतकरी कुटुंबांना दरवर्षी ६ हजारांचे आर्थिक सहाय्य ३ टप्यात करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील पात्र शेतकरी कुटुंबांना निश्चितपणे आर्थिक सहाय्य करण्याच्या कामास सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल.  पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेची जिल्ह्यात गतिमान वाटचाल सुरू असून आजमितीस जिल्ह्यात या योजनेस पात्र असणाऱ्या ३ लाख ७६ हजार ४३९ कुटुंबांपैकी ३ लाख १ हजार शेतकरी कुटुंबांची नोंदणी करून पुणे विभागातच नव्हे, तर किंबहुना राज्यात कोल्हापूर जिल्हा आघाडीवर आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यातील ७ हजार ४०० शेतकरी कुटुंबांच्या बॅंक खात्यावर पहिल्या हप्त्याची रक्कम जमा केली असून येत्या २-३ दिवसांत आणखीन ३१ हजार शेतकरी कुटुंबांच्या बॅंक खात्यात पहिल्या हप्त्याची रक्कम जमा करण्याची कार्यवाही केली जाणार आहे.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी स्वागत केले. कृषी विकास अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी उपसंचालक श्रीमती फडके यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाची थेट प्रसारण आणि गोरखपूर येथे सुरू असलेला पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या प्रारंभाचे थेट प्रक्षेपण या वेळी करण्यात आले. कार्यक्रमास जिल्हा अग्रणी प्रबंधक राहुल माने, तहसीलदार सचिन गिरी, गटविकास अधिकारी सचिन घाटगे आदी उपस्थित होते. शिरोळ येथे तहसीलदार गजानन गुरव यांच्याहस्ते प्रमुख दहा शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. सहाय्यक निबंधक प्रदीप मालगावे, मंडल कृषी अधिकारी महावीर गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. कृषी पर्यवेक्षक संजय सुतार यांनी सूत्रसंचालन केले.  कणेरी येथील कृषी विज्ञान केंद्रामध्ये नाबार्डचे बँकेचे नंदू नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. केंद्र प्रमुख डॉ. रवींद्र सिंग यांच्यासहित राजेंद्र वावरे, पांडूरंग काळे, सुनील कुमार, डॉ. पराग तुरखुडे, डॉ. चंद्रकांत धांडोरे, प्रतिभा ठोंबरे, आर. डी. शिंदे, पांडूरंग राजेश आदि शास्त्रज्ञ व अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com