अडीच हजार एकरांवर दुबार पेरणीचे संकट

अडीच हजार एकरांवर दुबार पेरणीचे संकट
अडीच हजार एकरांवर दुबार पेरणीचे संकट

यवतमाळ ः पावसाच्या हजेरीमुळे पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. परंतु, त्यानंतरही जिल्ह्यातील अडीच हजार हेक्‍टरवर दुबार पेरणीचे संकट ओढविल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. 

जिल्ह्याचे सरासरी खरीप लावगड क्षेत्र ९ लाख हेक्‍टर आहे. त्यापैकी ८ लाख ८८ हजार ३२८ हेक्‍टरवर आतापर्यंत पेरणी झाली आहे. मध्यंतरी पावसाने उसंत घेतल्याने पेरणीचा वेग मंदावला होता. पावसाने मोठा खंड दिल्याने आणि तापमानातही वाढ झाल्याने पीक करपण्याची शक्‍यता वाढली होती. हंगाम हातातून जाईल, अशी भीती शेतकऱ्यांना होती. 

पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांवरील मोठे संकट टळले. दरम्यान मध्यंतरी पावसाने ब्रेक घेतल्याने पिकांची वाढ खुंटली होती. त्याचा फटका जिल्ह्यातील अडीच हजार हेक्‍टरवरील क्षेत्राला बसल्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. यामध्ये सर्वाधिक क्षेत्र हे कापसाखालील असल्याचेही सांगण्यात येते. पावसाअभावी बाधित झालेल्या पिकांचे सर्वेक्षण कृषी विभागाने सुरू केले आहे. 

कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार अडीच हजार हेक्‍टरवरील पिके पावसाअभावी अडचणीत आली आहेत. या ठिकाणी दुबार पेरणी शेतकऱ्यांना करावी लागणार आहे. आधीच्याच पेरणीसाठी पैशाची जुळवाजुळव करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर नव्याने पैशाची सोय करणे आणि पर्यायी पीक घेण्याचे आव्हान यामुळे निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे गेल्या हंगामात कापसाला चांगला भाव मिळाल्याने या वेळी शेतकऱ्यांनी सोयाबीनऐवजी कापूस लागवडीला प्राधान्य दिले आहे. खरीप हंगामात २ लाख ५६ हजार ६७८ हेक्‍टरवर सोयाबीन, एक लाख २४ हजार ९५९ हेक्‍टरवर तूर, १३ हजार ७२७ हेक्‍टरवर ज्वारी तर सर्वाधिक चार लाख ६४ हजार ८०७ हेक्‍टरवर कापसाची पेरणी झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com