खानदेशात दुष्काळ निवारणात अडचणी

खानदेशात दुष्काळ निवारणात अडचणी
खानदेशात दुष्काळ निवारणात अडचणी

जळगाव : दुष्काळी व पिण्याच्या पाण्याची तीव्र समस्या असलेल्या गावांमध्ये काही तात्पुरत्या उपाययोजना सुरू आहेत. विहीर खोलीकरणाची कामे हाती घेतली आहेत. मात्र पाण्याचे स्राेतच मिळत नसल्याने, वाळूपुरवठा ठप्प असल्याने निधी वाया जात असल्याची स्थिती आहे.

खानदेशात प्रशासनाच्या अहवालानुसार सुमारे २६५ गावांमध्ये टंचाई निवारणार्थ उपाययोजना सुरू आहेत. परंतु, या उपाययोजनांना अडचणी येत आहेत. जळगाव जिल्ह्यात सुमारे ४० टॅंकर सुरू आहेत. ते पुढे अजून वाढतील. २५ गावांमध्ये विहीर खोलीकरणाची कामे सुरू आहेत. ३१ गावांमध्ये तात्पुरत्या उपायोजना हाती घेतल्या आहेत.

कूपनलिका तयार करणे, नळ योजना राबविणे, योजनेची दुरुस्ती अशी कामे आहेत. परंतु, पाण्याचे स्राेतच मिळत नसल्याने हा निधी वाया जात आहे. 

विहीर खोलीकरणाच्या कामाला वाळूपुरवठा ठप्प असल्याची अडचण आहे. सध्या वाळू उपसा जळगाव, धरणगाव भागात गिरणा नदीत बंद आहे. वाळूची चोरटी वाहतूक सुरू आहे. मात्र ती शासकीय कामांसाठी वापरता येत नाही. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com