रत्नागिरी ः ‘‘शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन, गट तयार करून अथवा सहकार पद्धतीने शेती केली, तर उत्पादन वाढेल. पिकांमधील गुणवत्ता वाढेल आणि फळ पिके निर्यातीमध्येही वाढ होईल. त्यामुळे उत्पादनासाठी येणारा खर्चही कमी होईल’’, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालय येथील अल्पबचत सभागृहात कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान यंत्रणेतर्फे (आत्मा) आयोजित जिल्हास्तरीय आंबा निर्यात कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुनंदा कुऱ्हाडे, कृषी पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक मिलिंद जोशी, प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाटे येथील कृषी विद्यावेत्ता डॉ. वैभव शिंदे आदी उपस्थित होते.
डॉ. पाटील म्हणाले, ‘‘पीक घेताना जैविक स्रोत वापरा. आरोग्याच्या दृष्टिने जैविक शेतीवर भर द्या. ’’
‘झाडांची तब्येत जाणून घ्या’
‘‘पोषक द्रव्य दिली तरच झाड चांगले उत्पादन देते. त्यासाठी बागेत जाऊन झाडांची तब्येत जाणून घेतली पाहिजे. टिश्यू लॅनालायसीस केले, तर त्या झाडाला काय आवश्यक आहे, ते समजू शकेल. त्यानुसार पुरक द्रव्ये देता येतील. आता तीच वेळ असून बागायतदारांनी त्यावर भर दिला पाहिजे. सध्या फुलकिडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी हापूसच्या बागेतील अन्य झाडे जगवली पाहिजेत. प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर बागायतदारांनी भर दिला पाहिजे,’’ असा सल्ला संशोधक डॉ. वैभव शिंदे यांनी दिला.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.