पीक नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत :विभागीय आयुक्त पीयूष सिंह

वाशीम : अतिवृष्टीने सोयाबीन आणि तूर पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पीक नुकसानीचे महसूल आणि कृषी विभागाने तातडीने पंचनामे करावेत, असे निर्देश विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी दिले.
Promptness of crop damage Punchnama should be done: Singh
Promptness of crop damage Punchnama should be done: Singh

वाशीम : अतिवृष्टीने सोयाबीन आणि तूर पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या पीक नुकसानीचे महसूल आणि कृषी विभागाने तातडीने पंचनामे करावेत, असे निर्देश विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत सिंह बोलत होते. या वेळी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील निकम, अपर जिल्हाधिकारी शहाजी पवार यांच्यासह विभाग प्रमुख उपस्थित होते.

सिंह म्हणाले, ‘‘जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे उत्पादन घेतले जाते. अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाचे जे नुकसान झाले आहे, त्या शेतातील पिकांचे अत्यंत काळजीपूर्वक पंचनामे करून नुकसानीचा अहवाल तयार करावा. संबंधित विमा कंपनीला याबाबत अवगत करावे. वाशीम हा आकांक्षित जिल्हा आहे. त्यामुळे स्वामित्व योजनेअंतर्गत ड्रोनद्वारे सर्व्हेक्षणाचे कामे त्वरित पूर्ण करावे.’’ 

आयुक्तांकडून पारडी, टकमोरमध्ये पाहणी

सिंह यांनी बैठकीपूर्वी वाशीम तालुक्यातील पारडी, टकमोर शिवारातील रामराव चौधरी यांच्या शेतीला भेट दिली. २८ व २९ सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीने चौधरी यांच्या सोयाबीन व तूर पिकाच्या नुकसानीची पाहणी केली. आपण पीकविमा काढला आहे. पीक नुकसानीची माहिती देण्यासाठी विमा कंपनीच्या प्रतिनिधीशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला. मात्र प्रतिसाद दिला नाही, असे चौधरी म्हणाले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com