'योग्य आर्थिक व्यवस्थापन हा शेती प्रगतीचा पाया'

योग्य आर्थिक व्यवस्थापन हा शेती प्रगतीचा पाया
योग्य आर्थिक व्यवस्थापन हा शेती प्रगतीचा पाया

नाशिक : ‘‘योग्य आर्थिक व्यवस्थापन हाच शेती प्रगतीचा पाया आहे. शेती व्यवस्थापनात आर्थिक नियोजनाचे महत्त्व सर्वात मोठे आहे. हाच श्रीमंतीचा मंत्र आहे``, असे प्रतिपादन आर्थिक नियोजन सल्लागार महेश सावरीकर यांनी केले.

‘ऍग्रोवन'तर्फे शुक्रवारी (ता. १२) निफाड येथील श्रीराम लॉन्स येथे ‘द्राक्षशेतीतील आर्थिक व्यवस्थापन'' या विषयावर विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. `यारा फर्टिलायझर्स`चे गौरवकुमार सिंग, नाशिक फार्म प्रॉडक्‍ट कंपनीचे अध्यक्ष अंकुश कुरवाडे, ॲग्रोकेअर कृषी मंचचे अध्यक्ष भूषण निकम, उद्योजक सुरेश कोंबडे, विजय उगले उपस्थित होते.

सावरीकर म्हणाले, ‘‘शेती व्यवसायात आव्हाने, समस्या आहेत. तसेच यात संधींचे अफाट दालन आहे. शिस्तबद्ध नियोजनातून कोणत्याही समस्येवर मात करणे शक्‍य आहे. त्यासाठी सकारात्मक दृष्टीकोन आवश्‍यक आहे. जोखमीचे व्यवस्थापन हे अत्यंत महत्वाचे असते. पाऊस, गारपीट, नैसर्गिक आपत्ती या संकटांचा सामना करणे हे अवघड असते. मात्र आपल्या उत्पन्नातून थोडीशी रक्कम सातत्याने बाजूला करीत बचत केल्यास यातून निर्माण झालेला निधी अडचणीच्या काळात उपयोगाला येतो. योग्य नियोजनातून नियमित उत्पन्नाची सोय करणे शक्‍य आहे. यासाठी योग्य आर्थिक नियोजन आवश्‍यक आहे.``

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com