अकोला : कपाशीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून, या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मंगळवारी (ता. २८) खामगाव येथे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या अांदोलन केले. तेथे कपाशीच्या कीडयुक्त बोंडे आणि परिपत्रकांची होळी केली.
अौरंगाबाद जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती संतोष पाटील जाधव (वजनापूरकर) यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी हे अांदोलन केले. या वेळी अांदोलकांनी कृषिमंत्र्यांच्या नावे निवेदन दिले. त्यात म्हटले, की राज्यात कपाशीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने उभी पिके उदध्वस्त झाली असून, शेतकरी हवालदिल झाले आहेत. तरीही अद्यापपर्यंत शासनाने कुठलीही दखल घेतलेली नाही. शेतकऱ्यांनी अात्मदहनासारखे अांदोलन केले तरी सरकारने झोपेचे सोंग घेतले अाहे. त्यांना जाग अालेली नाही.
कापूस कायद्याअंतर्गत कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांकडून भरून घेत असलेल्या नमुना ‘जी’ व ‘एच’ नमुना ‘अाय’मधील जाचक अटी शिथिल करून तत्काळ सरसकट पंचनामे करणे गरजेचे अाहे; परंतु शासनाने यामध्ये केवळ वेळकाढू धोरण अवलंबल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले अाहे.
२४ नोव्हेंबरला अौरंगाबाद जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात अात्मदहनासारखा प्रकार घडला. त्याची कुठलीही दखल न घेतल्याने मंगळवारी (ता. २८) कृषिमंत्र्यांच्या बंगल्यासमोर अांदोलन करण्यात अाले. कायद्यातील जाचक अटी रद्द करून सरसकट पंचनामे करावेत व शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये अनुदान जाहीर करावे, अशी मागणी करण्यात अाली.
शासनाने मागण्यांची तातडीने दखल न घेतल्यास अाणखी तीव्र अांदोलन करण्याचा इशारा संतोष पाटील यांनी या वेळी दिला.