जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादकांना विमा परतावा द्या

जळगाव : शेतकरी प्रश्‍नी शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना व काँग्रेसच्या किसान सेलतर्फे चोपडा (जि.जळगाव) येथे हवामानावर आधारित फळ पीक विमा योजनेतून केळी उत्पादकांना २०१९-२० या वर्षासाठी मंजूर परतावे तत्काळ मिळावे.
 Provide insurance refund to banana growers in Jalgaon district
Provide insurance refund to banana growers in Jalgaon district

जळगाव : शेतकरी प्रश्‍नी शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना व काँग्रेसच्या किसान सेलतर्फे चोपडा (जि.जळगाव) येथे हवामानावर आधारित फळ पीक विमा योजनेतून केळी उत्पादकांना २०१९-२० या वर्षासाठी मंजूर परतावे तत्काळ मिळावे, यासाठी तहसिलदार अनिल गावित यांना निवेदन देण्यात आले. 

निवेदनानुसार, विमा संरक्षण कालावधी केळी पिकासाठी नऊ महिन्यांचा होता. हा कालावधी जुलै २०२० मध्ये संपला आहे. यामुळे परतावे लवकर मिळण्याची गरज आहे. 

विमा संरक्षण कालावधी संपल्यानंतर ४५ दिवसांत हे परतावे पात्र शेतकऱ्यांना मिळण्याचा नियम आहे. ४५ दिवस विमा संरक्षण कालावधी संपण्यास झाले आहेत. यामुळे परतावे लवकर व्याजासह मिळायला हवेत. परतावे लवकर न मिळाल्यास आंदोलन केले जाईल, असा इशारा संघटनेतर्फे देण्यात आला. निवेदन देताना पंकज पाटील, भूषण पाटील, नितीन निकम, गुलाब पाटील, सुरेश पाटील आदी उपस्थि होते. 

काँग्रेसच्या किसान सेलतर्फे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना निवेदन देण्यात आले. त्यानुसार, अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले. पंचनामे करून भरपाई मिळायला हवी. शेतरस्त्यांसाठी पुरेसा निधी मिळायला हवा. कांद्याची निर्यात पुन्हा सुरू करावी. कापसाला कमी दर मिळतात. यामुळे हमीभाव कसा मिळेल, यासाठी तरतूद, योजना राबवावी, 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com