पुणे : ग्रामीण भागातील अर्थ व्यवस्थेचा कणा असलेले आठवडे बाजार कोरोना संकटामुळे अद्याप बंदच आहेत. ग्रामीण भागातील रुग्णांचा पॉझिटिव्हिटीचा दर पाच टक्क्यांपेक्षा कमी होत नाही, तोपर्यंत निर्बंध कायम असल्याने बंदची भूमिका प्रशासनाने घेतली आहे. याचा फटका मात्र खरिपाच्या लगबगीत असलेल्या शेतकऱ्यांना बसला आहे. आठवडे बाजारावर देशी बियाणे आणि पशुपालकांना विविध साधनासामग्रीच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना अवलंबून राहावे लागत आहे. जिल्ह्यातील चाकण, आळेफाटा, जुन्नरसह बारामती, इंदापूर, दौंड, मावळ मुळशी भोर, वेल्हा, पुरंदर, शिरूर या तालुक्यांच्या विविध भागांत आठवडे बाजार भरत असतात. सध्या चाकणचा जनावरांचा बाजार आणि इंदापूर तसे वेल्हे तालुक्यातील आठवडे बाजार सुरू झाले आहेत. आठवडे बाजारावर बाराबलुत्यांचे व्यवसाय अवलंबून आहेत. आठवडे बाजार बंद असल्याने बाराबलुतेदार आर्थिक विवंचनेत आहेत.
प्रतिक्रिया जिल्ह्यातील ग्रामीण भाग आजही चौथ्या स्तरात असून, कोरोना निर्बंध शिथिल झालेले नाहीत. यामुळेच टाळेबंदीत बंद झालेले आठवडे बाजार अद्याप सुरू झालेले नाहीत. रुग्ण संख्या आणि पॉझिटिव्हिटीचे दर कमी झाल्यानंतरच आठवडे बाजार सुरू करण्याचे निर्णय घेण्यात येतील. -डॉ. जयश्री कटारे, निवासी उपजिल्हाधिकारी
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.