पुणे विभागाला पाणीटंचाईने ग्रासले

पुणे विभागाला पाणीटंचाईने ग्रासले
पुणे विभागाला पाणीटंचाईने ग्रासले

पुणे : पुणे विभागातील कोरडवाहू तालुक्यांमध्ये पाणीटंचाईच्या झळा दिवसेंदिवस तीव्र होत आहेत. सातारा, पुणे, सांगली, सोलापूर जिल्ह्यांतील तब्बल २० तालुक्यांत टंचाईच्या झळानीं ग्रासले आहे. विभागातील १६६ गावे ११२९ वाड्यांमधील टंचाई भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी १७२ टॅंकर सुरू करावे लागले आहेत. विभागातील सुमारे साडेतीन लाख लोकांना, तर २६ हजारहून अधिक जनावरांना टॅंकरच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. पाणी पुरवठ्यासाठी १५६ विहिरी आणि कूपनलिकांचे अधिग्रहण करण्यात आल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे देण्यात आली. 

पाण्याचा उपसा वाढल्याने भूजलपातळी सातत्याने कमी होत आहे. पिण्याच्या पाण्याचे स्रोत असलेल्या विहिरी, बोअरवेल कोरडे पडले. सांगली जिल्ह्यातील सर्वाधिक पाणीटंचाई असून, समारे १ लाख २७ हजार, साताऱ्यातील जिल्ह्यातील सुमारे ९३ हजार, पुणे जिल्ह्यातील १ लाख २ हजार आणि सोलापुरातील सुमारे २३ हजार हजार लोकसंख्येला टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागत आहेत. 

माण तालुक्यातील सर्वाधिक ७४ हजार, तर जतमधील ६८ हजार नागरिकांना टंचाईच्या झळा बसत आहे. साताऱ्यातील २४ हजार १०५, सोलापूरातील २ हजार ४४४ अशा सुमारे २६ हजार जनावरांनाही टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. 

सांगली जिल्ह्यातील टंचाई भीषण होत असून, ६४ गावे ३९७ वाड्यांना ५४ टॅंकरने पाणी पुरवठा केला जात आहे. तर सातारा जिल्ह्यात टंचाईची तीव्रता अधिक असून, ५८ गावे ३४५ वाड्यांना ५६ टॅंकरने पाणी देण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यातील ३० गावे ३२४ वाड्यांमध्ये ५१ टॅंकरने, तर सोलापूरमधील १४ गावे ६३ वाड्यांना ११ टॅंकरने पाणी देण्यात येत आहे.

विभागात साताऱ्यातील माण तालुक्याच्या सर्वाधिक पाणीटंचाई असून, तेथील ४४ गावे ३२५ वाड्यांतील ४३ टॅंकरने पाणी द्यावे लागत आहे, तर आटपाडी, जत मध्येही टंचाई वाढत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात मात्र अद्यापही टंचाई भासत नसल्याचे विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे सांगण्यात आले.

टंचाईग्रस्त भागात सुरू असलेल्या टॅंकरची तालुकानिहाय संख्या  पुणे - शिरूर १७, बारामती १६, दौंड ७, आंबेगाव ५, पुरंदर ३, जुन्नर २, इंदापूर १. सातारा - माण ४३, खटाव ६, कारेगाव ५, फलटण २.  सांगली - जत २६, आटपाडी १६, कवठेमहांकाळ ६, खानापूर ५, तासगाव १. सोलापूर - माढा ३, करमाळा ३, सांगोला २, अक्कलकोट २.

विभागातील पाणीटंचाईची जिल्हानिहाय स्थिती
तालुके गावे वाड्या टॅंकर
पुणे ३० ३२४ ५१
सातारा ५८ ३४५ ५६
सांगली ६४ ३९७ ५४
सोलापूर १४ ६३ ११
एकूण १६६ ११२९ १७२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com