औरंगाबाद : सुरुवातीपासून नैसर्गिक संकटांच्या सुरू असलेल्या मालिकेमुळे रब्बी पिकांसह फळपिकांची परवड होत आहे. त्यामुळे आधी खरीप हातचा गेल्यानंतर रब्बी तरी आधार देईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. ती आता संकटात सापडली आहे.
मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत सर्वसाधारण १९ लाख १९ हजार ५१६ हेक्टरच्या तुलनेत २४ लाख २ हजार ९०७ हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली. यामध्ये औरंगाबाद विभागातील ९ लाख ४९ हजार ८२९ हेक्टरसह लातूर कृषी विभागांतर्गत १४ लाख ५३ हजार ७८ हेक्टरवरील पिकांचा समावेश आहे. खरीप हातचा गेल्यानंतर सर्व आशा रब्बीवर अवलंबून आहे. आधी जमिनी तयार करायला अवधी गेला आणि आता वातावरण पोषक नसल्याने पिकंही अडचणीत आहेत.
पिकांना अपेक्षित कालावधीत थंडी मिळाली नाही. त्यामुळे ज्वारी, गहू, भाजीपाला, मका, मोसंबी, डाळिंब आदी फळपिकांवरील संकट कायम आहे. ज्वारी, गहू या धान्यपिकांसह मोसंबी, डाळिंब या फळपिकांवर, भाजीपाल्यातील टोमॅटो, कांदा आदी पिकांवर माव्याचा प्रादुर्भाव वाढतो आहे. आंब्यावरही मावा, तुडतुड्यांचा प्रादुर्भाव वाढला असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली.
जिल्हानिहाय पेरणी क्षेत्र (हेक्टरमध्ये)
औरंगाबाद | २ लाख ३९ हजार ९४० |
जालना | २ लाख ७९ हजार २१६ |
बीड | ४ लाख ३० हजार ६७३ |
लातूर | ३ लाख ४१ हजार ४०८ |
उस्मानाबाद | ४ लाख २७ हजार ४४९ |
नांदेड | २ लाख ७३ हजार १५० |
परभणी | २ लाख ५३ हजार ६३७ |
हिंगोली | १ लाख ५६ हजार ६३४ |
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.