जळगाव ः रब्बी हंगामातील उत्पादनाची टक्केवारी बहुतांश थंडी किती प्रमाणात पडते, यावर अवलंबून असते. यंदा मात्र चक्क गेल्या पाच वर्षांत पहिल्यांदा १७१ टक्के रब्बीची पेरणी झाली आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे अजूनही जमिनीत पाणी असल्याने शेतकऱ्यांनी रब्बीची सर्वाधिक पेरणी केली आहे. गतवर्षी हवा तसा पाऊस न झाल्याने सर्वांच्या आशांवर पाणी फिरले होते. रब्बी हंगामात केवळ ९२ हजार हेक्टरवर पेरणी झाली होती. यंदा मात्र १३९ टक्के पाऊस झाला. ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यांत अतिवृष्टीने हाती आलेला हंगाम निसर्गाने हिरावून घेतला. अतिवृष्टीने मात्र जिल्ह्यातील सर्व मोठी, लहान शंभर टक्क्यांवर भरून वाहू लागली. त्याचाच परिणाम आजही जमिनीत ओल कायम आहे. खरीप जरी हाताचा गेला गेला तरी शेतकऱ्यांनी रब्बी पिकांवर आशा कायम ठेवत गहू, हरभरा, मका, ज्वारी पिकांची सर्वाधिक पेरणी केली आहे. उन्हाळी बाजरी, तीळ, तुरीचा पेरा अजूनही सुरूच आहे. शेतात ओल आहे. विहिरी, कूपनलिका यामध्ये पाण्याची पातळी कायम आहे. यामुळे शेतकरी कापूस उपटून त्याठिकाणी तीन महिन्यांत येणारी पिके घेत आहेत.
यंदा पाऊस चांगला झाल्याने रब्बी पिके शेतकऱ्यांनी सर्वाधिक घेतली आहे. गतवर्षी रब्बीची पेरणी केवळ ९२ हजार हेक्टरवर होती. यंदा १७१ टक्के पेरणी झाली आहे. गहू, हरभरा, मका पिकांना शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले आहे. - संभाजी ठाकूर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.