कोल्हापूर जिल्ह्यात केवळ पाच टक्के क्षेत्रावर रब्बीची पेरणी

कोल्हापूर जिल्ह्यात केवळ पाच टक्के क्षेत्रावर रब्बीची पेरणी
कोल्हापूर जिल्ह्यात केवळ पाच टक्के क्षेत्रावर रब्बीची पेरणी

कोल्हापूर : पावसाचा फटका खरीप हंगामात बसल्याने याचा परिणाम रब्बीच्या पेरण्यावर होत आहे. नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत रब्बीच्या केवळ पाच टक्के पेरण्या झाल्या आहेत. यामुळे हा हंगाम लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जमिनीत ओल असल्याने शेतकरी पेरणीला प्राधान्य देतील, पण रब्बी हंगाम उशिरा सुरू होईल, अशी शक्यता सध्या जिल्ह्यात आहे. 

जिल्ह्यात ज्वारी, गहू, मका आदी तृणधान्याखाली २९ हजार ९५५ हेक्टर क्षेत्र निश्चित केले आहे. त्यापैकी केवळ १ हजार ५६१ हेक्टरवर पेरणी झाली आहे. यामध्ये सर्वाधिक पेरणी ज्वारीची आहे. हरभरा, उडीद, मूग, आदी कडधान्याचे १० हजार २६७ हेक्टर क्षेत्र निश्चित केले आहे.

आतापर्यंत केवळ १०० हेक्टर क्षेत्रावर पेरणी होऊ शकली. करडई, सूर्यफूल या गळित धान्याबाबतही स्थिती फारशी समाधानकारक नाही.  त्यामुळे ४० हजार हेक्टर उद्दिष्टापैकी केवळ १ हजार ७६४ हेक्टरवर म्हणजेच एकूण क्षेत्राच्या केवळ ४.३८ टक्के रब्बीची पेरणी झाली आहे. 

पेरणीचा हंगाम लांबत गेल्यानंतर जमिनीतील ओलावा नष्ट होऊन उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता असते. सुमारे चार महिन्यांत पिके मार्चअखेर पक्व अवस्थेत येतील. ओलावा कमी होऊन उत्पादन घटण्याची अधिक शक्यता असते. या परिस्थितीचा विचार करता खरीप पाठोपाठ रब्बी हंगामातील उत्पादन कमी होईल. त्याचा गंभीर परिणाम ग्रामीण अर्थव्यवस्थेवर पडेल, अशी भिती तज्ज्ञांनी व्यक्त केली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com