नगर जिल्ह्यात सात लाख १३ हजार हेक्टरवर रब्बीचे नियोजन

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर  ः जिल्ह्यात यंदा रब्बी हंगामात सात लाख १३ हजार २०० हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे कृषी विभागाने नियोजन केले आहे. मात्र अजून जिल्ह्यामधील काही भागांचा अपवाद वगळता बहुतांश ठिकाणी पुरेसा पाऊस नसल्याने पाणी साठवण झालेले नाही. त्यामुळे चिंता कायम आहे. शेतकऱ्यांनी रब्बीचे नियोजन केले असले तरी सारी मदार परतीच्या पावसावरच अवलंबून आहे. 

जिल्ह्यात खरिपापेक्षा रब्बीत पेरणी क्षेत्र अधिक असते. त्या अनुषंगाने कृषी विभागाकडून बियाणे, खते व अन्य बाबींचे नियोजन केले जाते. मागील तीन वर्षांतील पेरणीचे क्षेत्र ग्राह्य धरून सरासरी क्षेत्र निश्चित केले जाते. गेल्या वर्षी दुष्काळी स्थिती होती. खरिपात पेरलेली पिके आली नाहीत. परतीचा पाऊस आला नसल्याने रब्बीत पेरणीच झाली नाही. जी काही थोडीफार पेरणी झाली होती. ते पीक जागेवरच करपून गेले होते. यंदा चांगला पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र यंदाही पावसाअभावी खरिपाचे पीक धोक्यातच आहे. दरवर्षीप्रमाणे रब्बीचे नियोजन केले असले तरी अजूनही पुरेसा पाऊस नसल्याने रब्बीचीही सारी मदार परतीच्या पावसावरच आहे. परतीचा पाऊस चांगला होईल असे गृहीत धरून रब्बीचे नियोजन केले जात आहे, असे कृषी विभागातून सांगण्यात आले. पोळ्यापासून दोन दिवस झाले, पाऊस कमी-जास्त प्रमाणात येत आहे. त्यामुळे पाऊस चांगला येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहेत. यंदाचे प्रस्तावित हेक्टर क्षेत्र ः (कंसात गतवर्षी पेरणी झालेले क्षेत्र) ः ज्वारी ः ५ लाख (२,२२,६००), गहू ः ९० हजार (३७,७००), मका ः २० हजार (७५००), रब्बी तृणधान्य ः २००  (४००), हरभरा ः १ लाख (४९,७००), करडई ः ५०० (४००), तीळ ः २०० (०), जवस ः ५०० (०), सूर्यफूल ः २००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com