सपाट जमिनीवर पेरणी पूर्व बांधणी करण्यासाठी व पावसाचे पाणी जमिनीत मुरवण्यासाठी सारा यंत्राने सारे पाडून त्यामध्ये बळीराम नांगराने दंड टाकावा. साधारणपणे १० × १० किंवा १० × १२ चौरस मीटर आकाराचे वाफे तयार करावेत. रब्बी हंगामातील कोरडवाहू पिकांची पेरणी ऑक्टोबर महिन्यापासून सुरु होते. या या पिकांची पूर्ण वाढ जमिनीतील ओलीवर होते. पावसाच्या परतीच्या कालावधीमध्ये मृदा व जलसंधारणच्या विविध पद्धतींचा वापर करून मूलस्थानी जलसंधारण करावे.जमिनीत पाणी अधिक मुरुवून धारण क्षमता वाढवणे गरजेचे आहे. असे केल्यास पीक उत्पादन वाढीसाठी फायदा होईल. बद्ध वरंबा पद्धत
उताराला आडवी नांगरणी
कंपार्टमेंट बंडींग
रुंद वरंबा पद्धत
आच्छादनाचा वापर : जमिनीतून ६० ते ७० टक्के ओलावा बाष्पीभवनामुळे नाहीसा होतो. हा ओलावा टिकवण्यासाठी शेतातून काढलेले तण,अगोदरच्या पिकांचे अवशेषांचा. वापर आच्छादनासाठी करावा. आच्छादन ज्वारी पेरणी नंतर ८ आठवड्याच्या आत केल्यास उत्पादनात १४ टक्यांपर्यंत वाढ होते. संपर्क - रविराज नलावडे, ८६०५९६७५२८ (रत्नाई कृषि महाविद्यालय, अकलूज,जि.सोलापूर)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.