शेतकऱ्यांना भीक नको; हवे घामाला दाम : रघुनाथदादा

शेतकऱ्यांला भीक नको; हवे घामाला दाम : रघुनाथदादा
शेतकऱ्यांला भीक नको; हवे घामाला दाम : रघुनाथदादा

पुणे : प्रभारी अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर करताना, खोट बोल पण रेटून बोल अशा पद्धतीने अर्थसंकल्प सादर केलेला आहे. शेतकऱ्यांसाठी कोणत्याही उपाययोजना नसलेला हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांच्या आत्महत्यावाढीला प्रोत्साहन देणारा आहे. शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार म्हणजे महिन्याला ५०० रुपये देणार असल्याचे जाहीर केले. ही सरकारची भीक शेतकऱ्याला नको; तर घामाला दाम पाहिजे. मात्र यासाठी कोणतीही उपाययोजना केलेली नाही, अशी प्रतिक्रिया शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी व्यक्त केली आहे.

केंद्रीय अर्थसंक्लपातील शेती क्षेत्राकरितांच्या तरतूदींबाबत बोलताना रघुनाथदादा म्हणाले, कीशेतकऱ्यांच्या घामावर गलेल्लठ्ठ नफा कमवून अब्जाधीशांची संख्या आणि शेतकरी आत्महत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शेतीमालाचे दर ५० टक्क्‍यांनी वाढविल्याचे धादांत खोटे बोलले, धानाची किंमत १५५० वरून १७५० रुपये केली. यामध्ये ५० टक्के कशी काय वाढ झाली, हे अर्थमंत्र्यांनी समजावून सांगावे. महामार्ग, विमानतळे बांधणीसाठी मोठ्या तरतुदी केल्या असल्या तरी, या तरतुदी भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारे आहे. या तरतुदींचा थेट फायदा शेतकऱ्यांना मिळणार नाही.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com