जगात सर्वाधिक दूध उत्पादनाची टिमकी वाजविणाऱ्या आपल्या देशात मुळातच दुधाचे सेवन फारच कमी आहे.
ताज्या घडामोडी
शेतीमालावरील निर्यातबंदी हटवा; अर्थव्यवस्था सावरेल : रघुनाथदादा
सांगली : डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन होत असताना कुणीच बोलत नाही. शेतीमाल हीच या देशाची ताकद आहे. त्यावरील निर्यातबंदी उठवली तरच अर्थव्यवस्था सावरेल, असे मत शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी व्यक्त केले.
सांगली : डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन होत असताना कुणीच बोलत नाही. शेतीमाल हीच या देशाची ताकद आहे. त्यावरील निर्यातबंदी उठवली तरच अर्थव्यवस्था सावरेल, असे मत शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी व्यक्त केले.
येथे गुरुवारी (ता. १६) पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, की पंडित नेहरूंपासून ते नरेंद्र मोदींपर्यंत सरकार कोणतेही असो त्यांचे धोरण शेतकरी विरोधी राहिले आहे. आता जागतिक स्तरावर रुपयाचे अवमूल्यन होत असतानाही सरकार सुधारणा करायला तयार नाही. आपल्याकडे औद्योगिक उत्पादने जागतिक दर्जाची नाहीत. त्यामुळे त्यातून निर्यातीला संधीच नाही. आपल्याकडे शेतीमाल हीच ताकद आहे. त्याच्या निर्यातीत अडथळे आणले जात आहेत. निर्यातबंदी उठवली तर महागाई वाढेल हे साफ चुकीचे आहे.
खासदार राजू शेट्टी यांच्याविरुद्ध पुन्हा एकदा शड्डू ठोकणार असल्याचे रघुनाथदादा पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले, की मी रस्त्यावरची लढाई सुरू ठेवली आहे आणि निवडणुकीच्या मैदानातही लढत राहणार आहे. या वेळी मी हातकणंगले मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढणार आहे.