समविचारी संघटनांना सोबत घेणार : रघुनाथदादा पाटील

रघुनाथदादा पाटील
रघुनाथदादा पाटील

कऱ्हाड, जि. सातारा  ः भाजप-शिवसेना तसेच काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येऊन निवडणूक लढविणार असतील, तर शेतकरी संघटना गप्प बसणार नाहीत. त्यासाठी राज्यातील समविचारी शेतकरी संघटनांना सोबत घेऊन विधानसभेच्या सर्व २८८ जागा लढविणार आहे, असा निर्धार शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी व्यक्त केला. 

रघुनाथदादा पाटील तसेच बळिराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांची संयुक्त पत्रकार परिषद शुक्रवारी येथे झाली. त्या वेळी ‘बळिराजा’चे प्रदेशाध्यक्ष बी. जी. पाटील, जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला, क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष विजय पाटील, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विकास जाधव  आदी उपस्थित होते.

या वेळी श्री. पाटील म्हणाले, की सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणामुळे राज्यातील अनेक कुटुंबे उद्‌ध्वस्त होत आहेत. अनेक कुटुंबांनी त्यांच्यावरील कर्जामुळे आत्महत्या केली. उसाला रिकव्हरी कमी असल्याचे भासवून शेतकऱ्यांना अल्पदर दिला जात आहे. त्यामुळे या सरकारला आता त्यांची जागा दाखवणे गरजेचे आहे. त्यासाठी समविचारी शेतकरी संघटना एकत्र येऊन विधानसभेच्या २८८ जागा लढणार असल्याचा निर्धार केला आहे.

शेतकरी संघटना, बळिराजा शेतकरी संघटना, प्रहार संघटना, क्रांतिकारी कम्युनिस्ट पार्टी, बळिराजा पार्टी आदी समविचारी संघटनांचा यात समावेश असल्याचे सांगून पाटील म्हणाले, जेवणाचे पूर्ण भरलेले ताट हे चिन्ह घेऊन निवडणूक लढवणार आहे. सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठीही सर्वानुमते तगडा उमेदवार देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com