खानदेशात सलग तिसऱ्या दिवशीही गारपीट, पावसाचा दणका 

खानदेशात सलग तीन दिवस गारपीट व वादळी पावसाने रब्बी पिकांची मोठी हानी झाली आहे. शेतकरी कोलमडला असून, तातडीने पंचनामे पूर्ण करून भरपाईची मागणी केली जात आहे.
khandesh
khandesh

जळगाव ः खानदेशात सलग तीन दिवस गारपीट व वादळी पावसाने रब्बी पिकांची मोठी हानी झाली आहे. शेतकरी कोलमडला असून, तातडीने पंचनामे पूर्ण करून भरपाईची मागणी केली जात आहे. पंचनाम्यांची कार्यवाही मंगळवारी (ता.२३) सुरू झाली. ही कार्यवाही येत्या दोन दिवसांत पूर्ण करून अहवाल प्रशासनाला सादर करण्याच्या सूचना धुळे, जळगावात पालकमंत्र्यांनी दिल्या आहेत. 

पंचनामे सुरू आहेत. परंतु मंगळवारी (ता. २३) रात्री ज्या भागात गारपीट, पाऊस झाला, त्या भागाला वगळण्यात आले होते. आता या भागातील नुकसानीची माहिती संकलित करून तातडीने भरपाई देण्याची मागणी केली जात आहे. खानदेशात मंगळवारी सायंकाळी, रात्रीच्या वादळी पावसासह गारपिटीने नुकसानीची आकडेवारी दुप्पट झाली आहे. आता सुमारे ४०० कोटींच्या पिकांची हानी झाली आहे. शिवाय गावांमध्ये गोठ्याची पत्रे उडून नुकसानीची माहिती आहे. तसेच काही भागांत पशुधनाची देखील हानी झाल्याची माहिती आहे.  मंगळवारीही नुकसान  मंगळवारी रात्री जळगाव, एरंडोल, धरणगाव, भुसावळ, जामनेर, पाचोरा, पारोळा या भागांत वादळी पाऊस झाला. तर धुळ्यातील साक्री, धुळे भागांत गारपीट व वादळाने नुकसान झाले. जळगाव, एरंडोल भागांत सुमारे ३५ मिनिटे वादळ झाले. यात पिके भुईसपाट झाली. बीजोत्पादनाचा कांदा, ज्वारी आडवी झाली आहे. तसेच मका, बाजरी पिकाचे देखील ६० ते ७० टक्के नुकसान झाले आहे. धुळ्यातही कांदा, मका, ज्वारी, बाजरी व भाजीपाला पिकांना फटका बसला आहे. टोमॅटो, कलिंगडाचे पीक पुरते हातचे गेल्याची स्थिती साक्री, धुळे भागांत झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com