कोल्हापूर : शासनाने गुरुवार (ता. १५) पासून ऊस हंगाम सुरू होईल, असे सांगितले असतानाही पश्चिम महाराष्ट्रात ऊस तोडणी सुरू झाली नाही. जोरदार पावसामुळे ऊस तोडणी यंत्रणा ठप्प असल्याचे चित्र अनेक ऊस उत्पादक जिल्ह्यांमध्ये होते.
सातत्यपूर्ण पावसामुळे हंगाम आणखी पंधरा दिवस लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार काही कारखान्यांनी १५ ऑक्टोबरपासून ऊस तोडणी सुरू करण्याचे नियोजन केले होते. गेल्या चार दिवसांपासून बहुतांश ऊस उत्पादक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस असल्याने कारखान्यांना ऊस तोडणीच्या हालचाली करणे अशक्य बनले आहे.
जिथे कामगार आले आहेत त्याच ठिकाणी थांबून राहिल्याने संपूर्ण तोडणी यंत्रणा ठप्प झाली आहे. जोपर्यंत पूर्ण पाऊस थांबून पडत नाही तोपर्यंत तोडणी अशक्य असल्याचे साखर कारखाना सूत्रांनी सांगितले. ऊस तोडणीचे नियोजन करणारे प्रयत्नात असणाऱ्या साखर कारखान्यांना हंगामाचा पहिला दिवसच भरपावसात काढावा लागला.
हंगामाचा प्रारंभ लांबणार जोरदार पावसामुळे ऐन हंगामातच अनिश्चित काळासाठी ऊस तोडणी ठप्प होण्याचा प्रकार गेल्या काही वर्षात पहिल्यांदाच घडल्याचे कारखाना सूत्रांनी सांगितले. ऊस तोडणीच्या प्लॉटला पूर्णपणे तळ्याचे स्वरूप आल्याने पाऊस थांबल्यानंतर किमान आठवड्याहून अधिक काळ तोडणीसाठी थांबावे लागणार आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.