पुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र जमिनीवर आले आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थान परिसरावर असलेल्या या प्रणालीची तीव्रता कमी होत आहे. आज (ता. १०) राज्यात पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार सरी पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
कमी दाब क्षेत्राच्या प्रभावामुळे शुक्रवारी (ता. ९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये उत्तर महाराष्ट्र, विदर्भात जोरदार पाऊस पडला. कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर काहीसा ओसरल्याचे दिसून आले. उत्तर महाराष्ट्रातील नवापूरच्या आक्रणी येथे २७० मिलिमीटर, धुळ्यातील शिरपूर येथे २१० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. विदर्भातील अमरावती, नागपूर जिल्ह्यांत पावसाचा जोर अधिक होता. कमी दाबाचे क्षेत्र पश्चिमेकडे सरकत असून, आज (ता. १०) गुजरातमध्ये अतिजोरदार पावसाचा इशारा आहे. उत्तर महाराष्ट्र, कोकणसह पश्चिम किनारपट्टीवर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे.
शुक्रवारी (ता. ९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस मिलिमीटरमध्ये (स्रोत - हवामान विभाग) :
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.