पुणे : गेल्या काही दिवसापासून पावसाने चांगलीच उघडीप दिली आहे. मात्र, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही भागात ढगाळ स्थिती आहे. यामुळे आज (ता.३०) धुळे, जळगाव, नाशिक, सातारा, सांगली, मराठवाड्यातील औरंगाबाद, परभणी, हिंगोली, लातूर जिल्हयात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला.
उत्तर भारतातून परतीचा पाऊस सुरू झाल्याने राज्यातील अनेक भागात उन्हाचा चटका वाढला आहे. कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात सकाळ पासून उन्हाचा पारा वाढत आहे. त्यामुळे कमाल तापमानात वाढ होऊ लागली आहे. विदर्भातील ब्रम्हपुरी येथे ३४.८ अंश सेल्सिअस एवढे कमाल तापमान नोंदविले गेले. त्याचबरोबर पुण्यातही उन्हाचा पारा वाढत असून उकाड्यात वाढ होत असल्याची स्थिती आहे. पुण्यात जवळपास ३०.८ अंश सेल्सिअस एवढे कमाल तापमान नोंदविले गेले. त्याचबरोबर पावसाने उघडिपीनंतर हवेत गारवा असल्याने किमान तापमानात काहीशी घट होऊ लागली आहे. महाबळेश्वर येथे १५.६ अंश सेल्सिअसची सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे.
सध्या राज्यात पाऊस थांबला आहे. त्यामुळे शेतीकामांनीही चांगलाच वेग घेतला असला तरी मराठवाडा व मध्य महाराष्ट्र, कोकणात वाफसा नसल्याने अजूनही शेतीकामे खोळंबल्याची स्थिती आहे. मंगळवारी (ता.२९) सकाळी आठ वाजेपर्यंत कोकणात तुरळक ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला. तर मध्य महाराष्ट्रात गगनबावडा, तळोदा, लोणावळा, कवठेमहांकाळ येथे तुरळक सरी बरसल्या. मराठवाड्यात पूर्णतःही ऊन पडल्याने शेतातील वाफसा कमी होऊ लागला आहे. पश्चिम विदर्भात पाऊस नसला तरी पूर्व भागात काही ठिकाणी हलक्या सरी पडल्या. मंगळवारी (ता.२९) सकाळी आठ वाजेपर्यंत झालेला पाऊस, मिलिमीटरमध्ये ः (स्त्रोत, हवामान विभाग)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.