दक्षिण भागात पावसाचा अंदाज

दक्षिण भागात पावसाचा अंदाज
दक्षिण भागात पावसाचा अंदाज

पुणे : उष्णतेच्या लाटेत होरपळणाऱ्या विदर्भात तीव्र लाटेचा (ऑरेंज अलर्ट) इशारा देण्यात आला आहे. यातच बंगालच्या उपसागरात घोंगावणाऱ्या फोणी चक्रीवादळाच्या प्रभावाने राज्याच्या दक्षिण भागात ढगाळ हवामान होत आहे. आज (ता. २९) कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सोलापूर, सांगली, मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. शनिवारी (ता. २८) कोल्हापूरातील आजरा तालुका आणि परिसरात गारांसह पाऊस पडला.   रविवारी (ता. २८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील अकोला येथे राज्यातील यंदाच्या हंगामातील उच्चांकी ४६.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुणे, नगर, जळगाव, सातारा, परभणी, अकोला, अमरावती, बुलडाणा, बह्मपुरी, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, यवतमाळ येथे उष्णतेची लाट आली आहे. आज (ता. २९) विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्ण लाट कायम राहणार असून, रात्रीच्या वेळी तापमान वाढून रात्रीही उष्ण ठरण्याची शक्यता आहे.  बंगालच्या उपसागरात ‘फोणी’ चक्रीवादळाची तीव्रता वाढत आहे. पूर्व किनारपट्टीकडे झेपावत असलेल्या चक्रीवादळामुळे आज (ता. २९)  तमिळनाडू, आंध्र प्रदेशालगत समुद्र खवळून उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे. केरळ, कर्नाटक, आंध्र, तमिळनाडूमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशाराही देण्यात आला आहे. मंगळवारपर्यंत (ता. ३०) हे चक्रीवादळ तमिळनाडू, आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याकडे येणार असून, बुधवारी (ता. १) उत्तरेकडे ओडिशाच्या दिशेने सरकून जाण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.   रविवारी (ता. २८) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ४२.९ (५.०), नगर ४५.१ (५.६), जळगाव ४५.० (२.३), कोल्हापूर ३९.९ (२.९), महाबळेश्वर ३५.७ (४.०), मालेगाव ४४.६ (४.१), नाशिक ४२.७ (४.४), सांगली ४१.५ (२.९), सातारा ४१.५ (४.८), सोलापूर ४३.१(२.३), अलिबाग ३४.९ (२.६), डहाणू ३६.३ (२.९), सांताक्रूझ ३५.८ (२.६), रत्नागिरी ३२.६ (०.०), औरंगाबाद ४३.६ (३.६), बीड ४४.४ (३.९), परभणी ४५.७ (४.२), नांदेड ४४.६ (२.५), उस्मानाबाद ४३.६ (४.४), अकोला ४६.७ (४.७), अमरावती ४६.० (३.९), बुलडाणा ४३.३ (५.१), बह्मपुरी ४६.४ (४.७), चंद्रपूर ४६.५ (३.८), गोंदिया ४३.० (१.५), नागपूर ४५.३ (३.३), वाशिम ४४.६, वर्धा ४६.० (३.८), यवतमाळ ४५.२(३.७).  अकोला ठरले जगात सर्वांत उष्ण सूर्य तळपल्याने महाराष्ट्र चांगलाच भाजून निघत आहे. रविवारी (ता. २८) अकोला जगातील सर्वांत उष्ण शहर ठरले आहे. जगातील दहा उष्ण ठिकाणांत महाराष्ट्रातील अकोल्यासह चंद्रपूर, बह्मपुरी, अमरावती, वर्धा या पाच ठिकाणांचा समावेश आहे. तर नागपूर, परभणी, यवतमाळ नगर यांचा पहिल्या १५ उष्ण ठिकाणांमध्ये क्रमांक लागला आहे. अमेरिकेतील ‘अल-डोरॅडो वेदर’ या हवामानविषयक नोंदी घेणाऱ्या जागतिक संकेतस्थळावर दररोज ही माहिती मिळते.  ठिकाण आणि  तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : अकोला ४६.७, खारगोणे (मध्य प्रदेश) ४६.६, चंद्रपूर ४६.५, बह्मपुरी ४६.४, अमरावती ४६, वर्धा ४६, बानदा (उत्तर प्रदेश) ४५.६, होशनंगाबाद (मध्य प्रदेश) ४५.५, खांडवा (मध्य प्रदेश) ४५.५, आदीलाबाद (तेलंगणा) ४५.३  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com