dam
dam

कोल्हापुरात पावसाचा जोर ओसरला 

जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला आहे. परिणामी पूरस्थिती आटोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कोल्हापूर: जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला आहे. परिणामी पूरस्थिती आटोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

रविवारी(ता.) दुपारी नदीची पातळी धोका पातळीपेक्षा दोन इंचाने कमी राहिली. याच बरोबर राधानगरी धरणातून होणारा विसर्ग ही थांबला आहे. यामुळे पाणी दोन दिवसात ओसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रविवारी दुपारी दोन वाजता पंचगंगा नदीची पातळी राजाराम बंधारा जवळ ४२ फूट १० इंच इतकी होती. या ठिकाणी पाणी धोका पातळी ४३ फूट इतकी आहे. 

राधानगरी धरणाच्या दोन दरवाजातून होणारा विसर्ग रविवारी सकाळी पूर्णपणे थांबला. सध्या राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून केवळ १४०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीत होत असल्याचे पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

धरणातून विसर्ग घटल्याने भोगावती पर्यायाने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत येत्या दोन दिवसात घट होण्याची शक्यता पाटबंधारे विभागातून व्यक्त करण्यात आली. पश्चिम भाग वगळता जिल्ह्यातील बहुतांशी तालुक्यामध्ये पावसाचा जोर ओसरला आहे. थांबून थांबून हलक्‍या ते मध्यम स्वरूपाच्या सरी सुरू होत्या. 

जिल्ह्यात अन्य ठिकाणी दोन तीन तासांनी एखादी हलकी सर पावसाचे स्वरूप आहे. वारणा धरणातून ८००० क्युसेक पाण्याचा विसर्ग विसर्ग सुरू आहे. अन्य धरणातून पाण्याचा विसर्ग काही प्रमाणात कमी केल्याने पूरस्थिती लवकर नियंत्रणात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांमध्ये गगनबावडा तालुक्‍यात सर्वाधिक ६५ मि.मी. पावसाची नोंद झाली. जिल्ह्यातील विविध नद्यांवरील ६७ बंधारे अद्यापही पाण्याखाली आहेत.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com